शिरूर तालुका

डिंग्रजवाडीत भिल्ल समाजाला मिळाले चाळीस वर्षांनी रेशन कार्ड

शिक्रापूर (शेरखान शेख): भिल्ल समाजाचे नागरिक शक्य त्या जागी राहून मोल मजुरी करुन कुटुंब चालवत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे नसल्याने त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने स्वराज्य बहुजन सेना व मातृत्व फाउंडेशनच्या वतीने भिल्ल समाजातील नागरिकांना दारिद्य रेषेखालील रेशन कार्ड देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलेला असता आता तब्बल 40 वर्षांनी येथील भिल्ल समाजातील नागरिकांना रेशन कार्ड मिळाल्याने भिल्ल समाजाने साखर वाटून आनंद साजरा केला आहे.

डिंग्रजवाडी (ता. शिरुर) येथील गायरान जमिनीमध्ये गेली 40 ते 45 वर्षापासून भिल्ल समाजाचे नागरिक कुटुंबियांसह राहत आहेत. त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड नसल्याने त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. सदर कुटुंबियांकडे कागदपत्रे नसल्याने त्यांची मुले देखील शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आल्याने स्वराज्य बहुजन सेना व मातृत्व फाउंडेशन यांच्या वतीने राजाराम दगडे पाटील यांच्या माध्यमातून या नागरिकांना दारिद्य रेषेखालील रेशन कार्ड देण्याच्या मागणीसाठी एप्रिल २०२२ मध्ये शिरुर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचे पत्र मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी यांसह शिरुर तहसीलदार येथे देण्यात आलेले असता येथील नागरिकांना रेशन कार्ड देण्यात येतील, असे आश्वासन शिरुर तहसीलदार यांनी दिलेले असता नुकतेच येथील 15 कुटुंबियांना रेशन कार्ड देण्यात आले असून सदर समाजातील नागरिकांना चाळीस वर्षांनी हक्काचे रेशन कार्ड मिळाल्याने नागरिकांनी साखर वाटून आनंद साजरा केला.

यावेळी स्वराज्य बहुजन सेना व मातृत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजाराम दगडे पाटील, अक्षय ठोंबरे, स्वाती शिवले, धनंजय नाणेकर, विठ्ठल तळोले, नितीन भवार, विक्रम ठोंबरे, रेखा भंडारे, मेघा गवारे, स्नेहलता दगडे पाटील, वैशाली ठोंबरे यांसह आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना भिल्ल समाजातील नागरिकांना प्रथमच रेशन कार्ड मिळाल्याने त्यांना झालेला आनंद पाहून समाधान वाटले असून पुढील काळात इतर नागरिकांना देखील रेशन कार्ड सह आदी सुविधा मिळवून देणार असल्याचे स्वराज्य बहुजन सेना व मातृत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजाराम दगडे पाटील यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव एमआयडीसीत बेकायदा पिस्तूल बाळगणारा जेरबंद; ३५ हजारांचा गावठी कट्टा जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) परिसरात बेकायदेशीररीत्या विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका व्यक्तीला…

1 तास ago

सहा महिन्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र’; जिल्हाध्यक्ष संजय पवारांचा मोठा दावा, ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार निवडणुका?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.…

1 तास ago

‘मित्रपक्षाची साथ मिळाली नाही’; पुण्यातील पराभवावर सचिन अहिरांची खंत, संघटना बळकट करण्याचा निर्धार

पुणे: विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुण्यात शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त…

2 तास ago

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव…

2 तास ago

स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’च्या आगमनासोबत ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेचा निरोप

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल सुरू असून प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची मेजवानी…

3 तास ago

‘गुंगी गुडिया’वरून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर पलटवार; महिलांचा अवमान थांबवा, उमेश पाटील यांची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून…

3 तास ago