शिरूर तालुका

चिमुकल्यांचा जीव गेला पण मुख्यमंत्री मात्र कबुतरांसाठी वेळ काढतात; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची खंत

बिबट्याच्या हल्ल्यांवर ठोस कृती आराखड्याची मागणी जनआंदोलनाचा इशारा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका व जुन्नर परिसरात गेल्या दहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे दोन निरागस चिमुकल्यांचा जीव जाण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाच वर्षांची शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तर काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथेही अशाच घटनेत आणखी एका चिमुकल्याचा बळी गेला. या घटनांनी संपूर्ण परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरखेड येथे भेट देऊन मयत शिवन्या बोंबेच्या कुटुंबाचे सांत्वन केले. या वेळी ते म्हणाले,

“दहा दिवसांत दोन लेकरांचे जीव गेले, ही दुर्दैवी बाब आहे. उपाययोजनेसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही मुख्यमंत्री कृती आराखड्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कबुतरांसाठी वेळ आहे, पण आमच्या लेकरांसाठी वेळ नाही, हे अत्यंत खेदजनक आहे.”

या वेळी सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस आणि वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्याकडून घटनेची माहिती घेत खासदार कोल्हे यांनी तातडीने बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या. स्मिता राजहंस यांनी “पिंजऱ्यांची संख्या कमी असल्याने अडचणी येत आहेत” असे सांगितले असता, कोल्हे म्हणाले,

“एका चिमुकल्याचा जीव जाणे ही फार मोठी हानी आहे. ही भरून निघू शकत नाही. या संदर्भात पालकमंत्र्यांसोबत लवकरच मीटिंग आहे, मी स्वतः त्यात उपस्थित राहणार आहे. उपाययोजनेसाठी तुम्हाला जे काही आवश्यक आहे ते निर्भीडपणे मांडा.”

दरम्यान, ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आमचा जीव महत्त्वाचा की बिबट्याचा? आमच्या लेकरांचं संरक्षण झालं पाहिजे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.या भागातील गावकरी बेल्हे-जेजुरी राज्य मार्गावर येत्या गुरुवारी (दि. १६) मोठ्या जनआंदोलनाची हाक देणार आहेत. या आंदोलनाचा इशारा प्रफुल्ल बोंबे यांनी डॉ. अमोल कोल्हे, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे आणि मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांच्या उपस्थितीत दिला.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दुःख, राग आणि असुरक्षिततेची भावना स्पष्ट दिसत होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

8 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

9 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

13 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

13 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

13 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

13 तास ago