शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्तीच्या पुलाजवळ अष्टविनायक महामार्गावर अगदी खेटून एक विहीर आहे. गाड्यांचा वेग आणि तिथे थोडेसे वळण असल्याने केव्हाही अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे विहीरीजवळील संरक्षण कठडयाची उंची वाढवण्याची मागणी मलठण ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.
तसेच अष्टविनायक महार्गावर कवठे येमाई गावठाणात इस्टिमेट प्रमाणे रस्ता केला नाही असा आरोप माजी सरपंच बबन पोकळे यांनी केला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम आम्ही कवठे ग्रामस्थ थांबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावठाणात रस्त्याची लांबी कमी केल्याने वाहनचालकांना नाहक त्रास होणार आहे कारण भिमाशंकर व पराग हे दोनही ऊस कारखाने सुरु झाल्यावर या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतुक सुरु असते. रस्त्याची लांबी कमी असल्याने त्याचा फटका आगामी काळात बसणार असल्याने इस्टीमेट प्रमाणे काम करण्याची मागणी कवठेकरांकडून जोर धरू लागली आहे.
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…