न्हावरे (अक्षय टेमगिरे): अरणगाव (ता. शिरुर) खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया आणि पिक व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत अरणगाव येथे विशेष शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पिकांचे उत्पादन वाढविणे, दर्जेदार उत्पन्न मिळविणे आणि बदलत्या हवामान परिस्थितीत योग्य नियोजन करणे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शिरुर तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस मंडळ कृषी अधिकारी अनिल पाटील, उपकृषी अधिकारी शिवाजी गोरे, सहाय्यक कृषी अधिकारी जयवंत भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. अरणगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आबा ठोंबरे यांच्या शेतात हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यशाळेत बोलताना उपकृषी अधिकारी शिवाजी गोरे यांनी शेतकऱ्यांना घरगुती बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी बियाणे उगवण क्षमता चाचणी करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. उगवण क्षमता तपासूनच पेरणी केल्यास अपेक्षित रोपसंख्या मिळते व उत्पादनात वाढ होते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी अनिल पाटील यांनी विविध पिकांसाठी बीज प्रक्रियेचे महत्त्व विशद केले. खरीप हंगामातील बाजरी, कांदा आणि ऊस लागवडीपूर्वी रासायनिक तसेच जैविक बीज प्रक्रिया कशी करावी, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. बीज प्रक्रियेमुळे बियाण्यांचे रोगांपासून संरक्षण होऊन पिकांची वाढ जोमदार होते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बदलत्या हवामानाचा विचार करुन एल निनोच्या संभाव्य परिणामांबाबत शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आले. उपलब्ध सिंचन सुविधांचा योग्य वापर करून पावसाच्या उपलब्धतेनुसार ऊस लागवड किंवा पेरणीचे नियोजन करावे, असा सल्लाही कृषी अधिकाऱ्यांनी दिला.
सहाय्यक कृषी अधिकारी जयवंत भगत यांनी ऊस लागवड तंत्रज्ञान, बेणे निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच हुमणी नियंत्रण या विषयांवर मार्गदर्शन केले. पिकांच्या उत्पादनवाढीसाठी विविध पिकांमध्ये बेसल डोसचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
या कार्यक्रमास तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आबा ठोंबरे, आत्मा समितीचे सदस्य धोंडीबा इंगळे, किसन बेंद्रे, बाबा ठोंबरे, आबा मखर, बाळासाहेब बेंद्रे, संभाजी कोकाटे, बाळू ठोंबरे, आत्माराम ठोंबरे, सिद्धार्थ वडघुले, गणेश शिंगाडे, तुकाराम ठोंबरे, संतोष ठोंबरे, सतीश ठोंबरे, राहुल ठोंबरे, शंकर ठोंबरे, सागर कुलाळ, शिवाजी शिंगटे, अशोक तांबे तसेच शिरुर तालुका महाराष्ट्र राज्य कांदा उपादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संभाजी कांडगे दत्तात्रय तरटे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळाली असून आगामी खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…
कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती, तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारून शेतकरी हैराण पाबळ (सुनिल…
शिरूर: शिरूर तालुक्यातील वाघाळे गावातील मान्यवरांचा १ जून रोजी सामूहिकरित्या वाढदिवस लहू थोरात (संचालक खरेदी…
शिरूर (अरुणकुमार मोटे): लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दबाव टाकून डिजिटल पुरावे हटविण्यास भाग…
शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…