Waghale-Birthday
शिरूर: शिरूर तालुक्यातील वाघाळे गावातील मान्यवरांचा १ जून रोजी सामूहिकरित्या वाढदिवस लहू थोरात (संचालक खरेदी विक्री संघ शिरूर तालुका) यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा केला. गावामधील अनेकांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आल्यानंतर सर्वांचाच आनंद व्दिगुणित झाला होता.
वाघाळे गावातील आदर्श शिक्षक संजय जगताप यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्यानंतर अधिक मासानिमित्त धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचा आस्वाद ग्रामस्थांनी घेतला. कार्यक्रमानिमित्त संतोष महाराज खेडकर (संस्थापक, भक्ती वेदांत वारकरी शिक्षण संस्था खंडाळे) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा आनंद ग्रामस्थांनी घेतला. सदर कार्यक्रमाची संकल्पना दिलीप थोरात (मा. उपसरपंच/मा. चेअरमन वि. का. सोसायटी वाघाळे) व ओंकार थोरात (अध्यक्ष, कलासागर प्रतिष्ठान) यांची होती.
कैलासराव सोनवणे (मा. संचालक घोडगंगा सहकारी कारखाना), संतोष लांडे पाटील (उद्योगपती), सुजित पवार, सदानंद अण्णा थोरात (उद्योजक) या मान्यवरांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देताना आयोजीत करण्यात आलेल्या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक केले.
दिलीप थोरात, ओंकार थोरात, संतोष गोरडे, राजेंद्र धायबर (उपसरपंच/ मा. चेअरमन), अशोकराव सोनावणे (मा. व्हा. चेअरमन), राजेंद्र भोसले (मा.उपसरपंच), सुहास काटे (अध्यक्ष, शेतकरी संघटना शिरूर), किसनराव गोरडे (मा. ग्रामपंचायत सदस्य), बाळाभाऊ थोरात (मा. ग्रामपंचायत सदस्य), विशाल शेळके (तज्ञ संचालक), संदीप धायबर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…
वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…
वाघाळे येथील कविता धायबर यांचा ‘आदर्श महिला’ पुरस्काराने दिल्लीत सन्मान!
वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!
वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…