टाकळी भिमातून गेलेली अल्पवयीन बालिका पालकांच्या स्वाधीन
शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथून अल्पवयीन अकरा वर्षीय बालिका बेपत्ता झालेली असताना सदर बालिका शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने पालकांच्या स्वाधीन गेली असून बापलेकांची भेट घडल्याने ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक करत पोलिसांचा सन्मान केला आहे.
टाकळी भीमा (ता. शिरुर) चांदणी यादव हि 11 वर्षीय बालिका 1 मार्च रोजी गावात दळण आणण्यासाठी गेली मात्र उशीर झाल्याने वडील रागवतील या भीतीने ती गावातून निघून गेली होती. दुसऱ्या दिवशी देखील चांदणीचा तपास न लागल्याने चांदणीचे वडील संदीप बनारसी यादव (वय ३२) रा. टाकळी भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दाखल केली.
सदर घटनेबाबत शिक्रापूर पोलीस या बालिकेचा शोध घेत असताना चांदणी हि तळेगाव ढमढेरे परिसरात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास कुंभार यांना मिळाली. त्यानंतर विकास कुंभार, मयूर कुंभार, अमोल नलगे यांनी सदर ठिकाणी जात गणेश लवांडे या युवकाच्या मदतीने बालिकेला शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आणून तिच्या वडिलांना याबाबत माहिती देऊन बोलावून घेतले दरम्यान आपल्या मुलीला पाहून तिच्या वडिलांना गहिवरुन आले.
बालिकेचा शोध घेण्यात पोलीस यशस्वी झाल्याने टाकळी भीमा ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील प्रकाश करपे, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास कुंभार, मयूर कुंभार, अमोल नलगे यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान पोलीस आमच्या साठी देवदूत असल्याची भावना चांदणीचे वडील संदीप यादव यांनी व्यक्त केली.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…