शिरूर तालुका

कान्हूर मेसाईत नवनिर्वाचित पोलिसांच्या हस्ते ध्वजारोहण

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 1 मे या महाराष्ट्र दिनी होणारे ध्वजारोहणचा मान हा नुकतेच पोलीस भरतीत यशस्वी होऊन कान्हूर मेसाईचे नाव उज्वल करणाऱ्या अशोक मिडगुले, अमोल मिडगुले, संकेत ढगे, विशाल धुमाळ व गौरव तागड या नवनिर्वाचित पोलिसांच्या हस्ते ध्वजपूजन करत ध्वजारोहण करण्यात आले आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोलीस दलात यशस्वी झालेल्या सर्व भावी पोलीस अमलदारांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करत भगवे फेटे बांधून तसेच सर्वांना श्री विठ्ठलाची मूर्ती, शाल व गुलाबपुष्प देऊन सर्वांना प्राचार्य अनिल शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विद्या विकास मंडळाचे सचिव सुदाम तलोळे, संचालक शहाजी दळवी, लहुजी तळोले, धनंजय तळोले, रामदास कुलट यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना ग्रामीण भागातील मुलांनी पोलीस भरती झालेल्या सर्वांचा आदर्श घ्यावा, तरुण वयात नको त्या गोष्टी करून आपले जीवन बरबाद करण्यापेक्षा या मुलांचा आदर्श शाळकरी विद्यार्थ्यांनी समोर ठेवावा, असे सांगत पोलीस दलात भरती झालेल्या अशोक मिडगुले, अमोल मिडगुले, विशाल धुमाळ, संकेत ढगे व गौरव तागड यांचे यश सर्वांना प्रेरक व पथदर्शी असल्याचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले तर पर्यवेक्षक किसन पांढरे यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

3 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

3 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

3 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

3 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

3 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

3 तास ago