शिरूर तालुका

विवेकानंदांचे तत्त्वज्ञान आम्हाला समजले नाही हे आमचे दुर्दैव…

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत संघटक रमेश टाकळकर यांचे मत

शिक्रापूर (शेरखान शेख): ज्यांच्या श्रमावर देश उभा आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष नको, अठरापगड जातीची जनता त्यांच्याशी प्रकरणा नको असे तत्त्वज्ञान सांगणारे विवेकानंद आम्हाला समजले नाहीत हे आमचे विचार दारिद्र्यच असल्याचे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत सहसंघटक रमेश टाकळकर यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र कार्यालयात विवेकानंद जयंती प्रसंगी मार्गदर्शन करताना रमेश टाकळकर बोलत होते. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शिरुर तालुकाध्यक्ष देवेंद्र जगताप, महिला प्रतिनिधी रोहिणी दरेकर, जिल्हा सचिव संतोष शिर्के, पंडित मासळकर, दत्तात्रय ननवरे, दत्ता कवाद यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना स्वामी विवेकानंद यांनी देशातील श्री शक्ती उपेक्षित असून स्त्रियांबरोबरच बहुजन समाजाच्या शिक्षणात देशाचे कल्याण आहे.

आपल्या आत्मतत्त्वाचे विकसन म्हणजे शिक्षण अशी स्वामी विवेकानंद यांची शिक्षणाबद्दलची व्याख्या होती. आपले संकुचित विचार थांबून बदलत्या जगाचा विचार करायला हवा. मातृभूमीचे विचारधन पाश्चिमात्यां समोर मांडून तेथील प्रगतीची विचारधारा आम्हाला दारिद्र्य निर्मूलनासाठी वापरता येईल तसेच अनेक धर्मातील लोक त्यांच्यातील बुद्धिवंताला नतमस्तक होत.

स्वामीजी मधील तत्त्वेता आम्हाला रुचला नाही हे आमचे विचार दारिद्र्य म्हणावे लागेल, असे देखील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत सहसंघटक रमेश टाकळकर यांनी सांगितले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शिरुर तालुकाध्यक्ष देवेंद्र जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

3 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

3 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

3 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

20 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

20 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

20 तास ago