शिरुर तालुक्यातील युवकांकडून नववर्षानिमित्त अनोखा संकल्प
शिक्रापूर (शेरखान शेख): नववर्षाचे स्वागत प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या उपक्रमाचा संकल्प करुन करत असताना शिरुर तालुक्यातील काही युवकांनी गड किल्ल्यांना भेटी देण्याच्या संकल्प करत चक्क 3 तासात महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले आहे.
करंदी (ता. शिरुर) सह जातेगाव येथील काही युवकांनी नववर्षाच्या सुरुवातीला गड किल्ले सर करण्याचा संकल्प केला. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक जावेद इनामदार, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे सचिव हमीद पठाण, गोरक्ष ढोकळे, शरद उमाप, सुरेश नप्ते, नितीन गवळी, दिगंबर नप्ते, उल्हास क्षिरसागर, बंटी पवार, सोहेल पठाण यांनी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी आपला मोर्चा कळसूबाई शिखराकडे वळवला त्यानंतर सकाळी 6 वाजता शिखरावर चढाई करत 3 तासात कळसूबाई शिखर सर करुन नववर्षाचे स्वागत केले.
याबाबत बोलताना प्रत्येक महिन्यात 1 ते 2 गड किल्ल्यांना भेटी देत युवकांमध्ये गड किल्ल्यांची आवड निर्माण करणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक जावेद इनामदार व राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे सचिव हमीद पठाण यांनी सांगितले.
सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…