शिरूर तालुका

शिरुर येथे पंचायत समिती आणि कृषी विभाग आयोजित खरिप आढावा बैठक संपन्न

कृषि विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचा सन्मान 

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये नुकतीच आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम नियोजन व आढावा सभा संपन्न झाली. खरीप हंगाम अनुषंगाने पंचायत समिती व कृषी विभागाने नियोजन सादर केले. यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी, ग्रामसेवक तलाठी व कृषी सहायक उपस्थित होते. शिरुर चे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी अजित देसाई तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, सेवा निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्यासह व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आमदार ॲड अशोक पवार उपस्थित होते.

यावेळी तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी खरीप हंगाम नियोजनाबाबत सादरीकरण केले. तसेच उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी यांच्या अडचणी आमदार ॲड अशोक पवार यांनी समजुन घेतल्या. कृषी विभागाने खरीप हंगाम 2021 मध्ये पिक स्पर्धा आयोजन केले होते. त्यामध्ये बाजरी, मुग, ज्वारी, गहु, हरभरा पिकाची स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात निर्वी गावचे जयसिंग सोनवणे यांनी बाजरी पिकाचे उच्चांकी उत्पादन घेत विभागात प्रथम, तर मोहनराव सोनवणे यांनी तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. तसेच मुग पिकात पुणे जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक शिरुर तालुक्याला मिळाला.

करडे येथील भाऊसाहेब पळसकर यांनी प्रथम, तर गुनाट येथील संभाजी भगत यांनी द्वितीय आणि अविनाश लंघे यांनी तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल आमदार पवार यांच्या हस्ते तालुक्यातील स्पर्धेत क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विविध पिकाचे उत्पादन चांगले येत असुन शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे आमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली गेल्याचे जयसिंग सोनवणे व मोहनराव सोनवणे यांनी सांगत समाधान व्यक्त केले. तसेच यापुढे राज्यात प्रथम येण्याच्या दृष्टीने वाटचाल करणार असल्याचे सांगितले.

पिकांच्या उत्पादन वाढीसाठी निर्वी आणि गुनाट परिसरात कृषी सहायक जयवंत भगत यांनी चांगले योगदान दिल्याची प्रतिक्रिया निर्वीचे जयसिंग सोनवणे यांनी व्यक्त केली. या खरीप नियोजन व आढावा बैठकिचे सुत्रसंचालन जयवंत भगत यांनी केले. तर पंचायत समितीचे कृषी अधिकारी जगताप यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

2 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

6 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

6 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

6 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

6 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

6 तास ago