शिरूर तालुका

टोमॅटोला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकुन देण्याची वेळ

शिरुर (तेजस फडके): सध्या टोम्याटोला प्रतिकिलो 5 रुपये बाजारभाव असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असुन टोम्याटो फेकुन देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोम्याटोला केलेला खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असुन कोणत्याचं तरकारी पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा झाला आहे.

टोम्याटोला एका एकरात नांगरणी,बेड तयार करणे, ठिबक सिंचन, रोपे लागवड, खते, औषधे तसेच माल परिपक्व होईपर्यंत अंदाजे एक लाख रुपये खर्च येतो. परंतु सतत असणारे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पडणारा पाऊस यामुळे यंदा टोम्याटोला प्रति दहा किलोला 50 रुपये बाजारभाव मिळत असुन दिवसेंदिवस मजुरी वाढत असुन रांजणगाव MIDC मुळे शेतात काम करण्यास मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

टोम्याटोला एकरी एक लाख रुपये खर्च केला असुन सध्या त्याला प्रति किलो 5 रुपये बाजारभाव मिळत असल्याने मोठा आर्थिक तोटा झाला आहे. यावर्षी पाऊस भरपुर झाल्याने कोणत्याही तरकारी पिकाला जास्त बाजारभाव मिळाला नाही. कांद्याला बाजार नसल्याने अजुनही कांदा वावरातचं पडून आहे. त्यात अवकाळी पाऊसामुळे कांद्याचेही नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

मनोज ओव्हाळ

शेतकरी, शिंदोडी

यंदा पाऊस मुबलक झाला तसेच अवकाळी पाऊसही झाला त्यामुळे मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी टोम्याटोची लागवड केली. परंतु सध्याचा बाजारभाव पाहता टोम्याटो बाजारात विक्रीला नेण्यापेक्षा तो फेकुन देण्याची वेळ आमच्यावर आली आहे. टोम्याटोचा खर्चसुद्धा वसुल होत नसल्याने तसेच अवकाळी पाऊसामुळे आमच्या वावरात टोम्याटोला अक्षरशः लाल चिखल झाला आहे.

प्रकाश शिंदे

शेतकरी, शिंदोडी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

3 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

7 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

7 तास ago