शिरूर तालुका

तळेगाव दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची लुट

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात जमिनींना सोन्याचे भाव आलेले असल्याने अनेकदा दुय्यम, निबंधक कार्यालयात नागरिकांची वेगवेगळ्या कारणाने गर्दी झालेली असताना दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांकडून खाजगी वकिलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह नागरिकांची आर्थिक लुट होत असल्याची तक्रार नोंदणी महानिरीक्षकांसह मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे दुय्यम निबंधक कार्यालय असून येथे नेहमी जमिनीचे खरेदी, विक्री, हक्कसोड यांसह आदी कामांचे दस्त बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते. मात्र सदर ठिकाणी दस्त नोंदणी तसेच वडिलोपार्जित जमिनीचे हक्कसोड करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी अधिकारी हे खाजगी एजंट तसेच वकिलांच्या मार्फत आर्थिक लुट करत असून शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत उभे ठेवत आहेत.

तसेच वशिला लावणाऱ्या वकिलांचे दस्त तातडीने करुन दिले जात असल्याची तक्रार पिंपळे खालसा येथील शेतकरी सचिन धुमाळ यांनी नोंदणी महानिरीक्षक यांच्या सह मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या सह मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयाचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी सुनील पिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता असे प्रकार येथे घडत नसल्याचे सांगत या प्रकरणाला दुजोरा त्यांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

7 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

9 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

9 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

9 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

9 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

9 तास ago