शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे शालेय शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रोहित राठोड, दत्ता कांदे व दत्ता कांदे याचे दाजी या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील सदर 14 वर्षीय अल्पवयीन अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना रोहित राठोड व दत्ता कांदे दोघे तिचा पाठलाग करत दमदाटी करत होते. एकदा दोघांनी मुलीचा फोटो काढून घेतला. त्यानंतर मुलीला भेटून तिचे फोटो दाखवत मोबाईल नंबर देऊन फोन कर नाहीतर तुझे फोटो कोणालाही दाखवू, अशी धमकी देत होते. त्यानंतर 5 एप्रिल रोजी दत्ता कांदे मुलीला अडवून तिचा हात पकडून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले.

दरम्यान मुलीने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी रोहित राठोड, दत्ता कांदे व दत्ता कांदे याचे दाजी तिघे रा. आनंदनगर सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

1 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

1 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

2 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

2 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

6 तास ago

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…

6 तास ago