शिरूर तालुका

मोराची चिंचोलीच्या निधीबाबत ग्रामस्थांची अण्णा हजारेंना भेट

शिक्रापूर: मोराची चिंचोली (ता. शिरुर) हे गाव राष्ट्रीय पक्षी मोरांच्या अस्तित्वासाठी ओळखले जाणारे गाव असून यासाठी शासनाकडून चालू केलेला पर्यटन निधी हा तेरा वर्षापासून बंद झाला असल्याने सदर निधी चालू करण्यासाठी नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

मोराची चिंचोली (ता. शिरुर) हे गाव सातत्याने दुष्काळ ग्रस्त असून येथे कायमस्वरुपी पाणी टंचाई आहे. या गावात भारताचा राष्ट्रीय पक्षी मोरांचे मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे. त्यामुळे या भागात अनेक पर्यटक येत असतात. येथे काही वर्षापूर्वी शासनाकडून पर्यटन निधी मिळत होता मात्र २००९ पासून पर्यटन निधी बंद झाला आहे. दरम्यान ग्रामस्थांनी याबाबत अनेकदा शासनाकडे मागणी करुन काही मार्ग निघला नाही. परंतु घरातील मुलांना जपावे त्या प्रकारे ग्रामस्थ मोरांची घेतात मात्र अन्न, पाणी नसल्याने काही मोरांचे स्थलांतर झाले आहे.

पुढील काळात अशीच स्थिती राहीली तर मोरांसोबत ग्रामस्थ देखील स्थलांतरित होतील. येथे शेती व पिण्यासाठी देखील पाण्याची समस्या असताना शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहवे लागते. चिंचोलीच्या जवळच्या परिसरात अवघ्या काही अंतरावर दोन्ही बाजुला चासकमान धरणाचे पाणी जाऊन सुध्दा गावला फायदा होत नाही. त्यामुळे या चासकमानचे पाणी गावाला उपलब्ध व्हावे. यासाठी माजी सैनिक शामराव धुमाळ व नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा करत मोराची चिंचोली गावच्या समस्येसाठी अण्णांनी लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…

4 तास ago

शिवसेनेकडून संजय राठोड यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी; विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त…

4 तास ago

अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह…

4 तास ago

दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण…

5 तास ago

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी…

5 तास ago

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस…

5 तास ago