शिरूर तालुका

टाकळी भिमातील मशिदीचा विकास करा मुस्लीम समाजाची आमदार अशोक पवारांकडे मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील मुस्लीम समाजाचे प्रार्थनास्थळ असलेल्या मशिदीची काही प्रमाणात दुरवस्था झालेली असल्याने सदर मशिदीच्या सुशोभीकरणासाठी निधी देत विकास करावा, अशी मागणी मुस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे केली आहे.

टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील सर्व समाजाचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत सर्व सन उत्सव एकोप्याने साजरे करत असतात. येथील मुस्लीम समाजाचे प्रार्थनास्थळ असलेल्या जामा मशीदची सध्या दुरवस्था झालेली असून मशिदीच्या संरक्षण भिंत, प्लेव्हिंग ब्लॉक तसेच प्रवेशद्वार साठी निधी उपलब्ध करुन येथील मशिदीला संरक्षण भिंत व आदी कामे करण्याची मागणी नुकतीच अशपाक मोमीन, फिरोजभाई तांबोळी, शारुक मुलाणी, अहेमत शेख, इकबाल मुलाणी, हामजा मुलाणी यांसह आदींनी आमदार अशोक पवार यांना निवेदन देत केली असून यावेळी पुढील काही कालावधी मध्ये सदर काम नक्कीच मार्गी लावले जाईल असे आश्वासन देखील आमदार अशोक पवार यांनी मुस्लीम बांधवांना दिले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

46 मिनिटे ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

22 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

22 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

22 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

22 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

24 तास ago