शिरूर तालुका

निमगाव म्हाळुंगीत वकिलाच्या सतर्कतेने वाचले दोन घोरपडींचे प्राण…

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे एका बोअरवेल मध्ये पडलेल्या 2 घोरपडींना एका वकिलाच्या सतर्कतेने जीवदान देऊन निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात प्राणीमित्रांना यश आले असून एका वकिलाच्या सतर्कतेने दोन घोरपडींचे प्राण वाचले आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अ‍ॅड. गणेश शिर्के यांच्या शेतातील बोअरवेल मधील मोटार बंद पडल्याने त्यांनी मोटार बाहेर काढून ठेवली होती. दुपारच्या सुमारास अ‍ॅड. शिर्के हे शेतात गेले असता त्यांनी बोअरवेल मध्ये पाहिले असता त्यांना आत मध्ये दोन साप असल्याचे जाणवणे त्यांनी तातडीने इंडिया बुक रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर शेरखान शेख यांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता त्यांना बोअरवेल मध्ये 2 घोरपड असल्याचे दिसून आले.

यावेळी सर्पमित्र शेरखान शेख यांनी अ‍ॅड. गणेश शिर्के, महेंद्र शिर्के, प्रवीण बामणे यांच्या मदतीने एका पाठोपाठ एक अशा दोन्ही घोरपडींना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर याबाबतची माहिती शिरुर वनविभागाने वनरक्षक प्रमोद पाटील यांना देत सदर घोरपडींना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. दरम्यान बोअरवेल मध्ये पडलेल्या घोरपडींना अगदी कमी जागेतून बाहेर काढून जीवदान दिल्याने अ‍ॅड. गणेश शिर्के यांनी सर्पमित्र शेरखान शेख यांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

12 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

16 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

16 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

16 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

16 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

17 तास ago