शिक्रापूर (शेरखान शेख): दिवाळी सन सर्वात महत्वाचा सन सर्व नागरिक आनंदाने दिवाळी साजरी करतात मग गरिबांचे काय या हेतूने काही शालेय मित्रांनी एकत्रित येत आपली दिवाळी म्हणजे गरिबांची दिवाळी हा उपक्रम, राबवून परिसरातील तब्बल 100 गरिबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दहावीचे जुने मित्र एकत्रित आले यावेळी आपण दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करतो मात्र गरिबांना ते शक्य नाही त्यामुळे आपण या दिवाळीला काही गरीब कुटुंबाना फराळ वाटप करुन त्यांचीही दिवाळी गोड करु, असा निर्णय घेतला त्यांनतर उपसरपंच मयूर करंजे, जितेंद्र जोशी, प्रीतम शिर्के, जालिंदर वाबळे, प्रशांत उबाळे, राजेंद्र गायकवाड, सचिन खेडकर, राजेंद्र खरपुडे, अविनाश कदम, सुभाष गायकवाड, विनोद काळे, गणेश काळकुटे, दत्तात्रय संभाजी मांढरे यांनी योगदान देत पैसे गोळा करुन गोळा झालेल्या पैशातून दिवाळी फराळ व मिठाई खरेदी करुन परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना वाटप सुरु केले आहे.
सदर उपक्रमातून समाजातील सुशिक्षित चांगल्या विचारांची लोकं एकत्र आली तर एक विधायक काम उभं राहतं याचा वस्तुपाठच हे मित्र देत आहेत. पाहिलीपासून जमलेली यांची गट्टी आज अशा पद्धतीने एका चांगल्या कामात देखील कायम असल्याने सदर युवकांच्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे, तर पुढील दिवाळी मध्ये दोनशेपेक्षा अधिक लोकांचं तोंड गोड करण्याचा आम्ही संकल्प केला असल्याचे सर शालेय मित्रांनी सांगितले.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…