शिक्रापूर (शेरखान शेख): दिवाळी सन सर्वात महत्वाचा सन सर्व नागरिक आनंदाने दिवाळी साजरी करतात मग गरिबांचे काय या हेतूने काही शालेय मित्रांनी एकत्रित येत आपली दिवाळी म्हणजे गरिबांची दिवाळी हा उपक्रम, राबवून परिसरातील तब्बल 100 गरिबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दहावीचे जुने मित्र एकत्रित आले यावेळी आपण दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करतो मात्र गरिबांना ते शक्य नाही त्यामुळे आपण या दिवाळीला काही गरीब कुटुंबाना फराळ वाटप करुन त्यांचीही दिवाळी गोड करु, असा निर्णय घेतला त्यांनतर उपसरपंच मयूर करंजे, जितेंद्र जोशी, प्रीतम शिर्के, जालिंदर वाबळे, प्रशांत उबाळे, राजेंद्र गायकवाड, सचिन खेडकर, राजेंद्र खरपुडे, अविनाश कदम, सुभाष गायकवाड, विनोद काळे, गणेश काळकुटे, दत्तात्रय संभाजी मांढरे यांनी योगदान देत पैसे गोळा करुन गोळा झालेल्या पैशातून दिवाळी फराळ व मिठाई खरेदी करुन परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना वाटप सुरु केले आहे.
सदर उपक्रमातून समाजातील सुशिक्षित चांगल्या विचारांची लोकं एकत्र आली तर एक विधायक काम उभं राहतं याचा वस्तुपाठच हे मित्र देत आहेत. पाहिलीपासून जमलेली यांची गट्टी आज अशा पद्धतीने एका चांगल्या कामात देखील कायम असल्याने सदर युवकांच्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे, तर पुढील दिवाळी मध्ये दोनशेपेक्षा अधिक लोकांचं तोंड गोड करण्याचा आम्ही संकल्प केला असल्याचे सर शालेय मित्रांनी सांगितले.
1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…
झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…
ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…
मुंबई: NEET पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसने वांद्रे…
100% नियमपालनाचा अहवाल असूनही रेस्टॉरंटचा परवाना न बहाल केल्याने न्यायालयाची एफडीएवर ताशेरे; हॉटेल मालकाच्या नुकसानभरपाईचा…