शिरूर तालुका

शिक्रापूरचा विजेचा प्रश्न सोडवत आश्वासनाची पूर्तता

शिक्रापूर ग्रामस्थांच्या आंदोलनाला विद्युत वितरणकडून यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मुख्य गावामध्ये अनेक दिवसांपासून विजेच्या समस्या असल्याने ग्रामस्थांनी मागील आठवड्यात विद्युत वितरण कार्यालयवर मोर्चा काढला असता अधिकाऱ्यांनी 8 दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असता नुकतेच विद्युत वितरणकडून शिक्रापूर गावासाठी नवीन अतिरिक्त विद्युत रोहित्र देण्यात आल्याने ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्वासनाची पूर्तता केल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक व महिला हैराण झालेले असताना ग्रामस्थ व महिलांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढत विजेच्या समस्या सोडवण्याची मागणी केली होती. यावेळी विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी 8 दिवसात सदर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिलेले असता नुकतेच नव्याने विद्युत रोहित्र गावात बसवण्यात आले.

यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे, माजी उपसरपंच रमेश थोरात, सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्या मोहिनी मांढरे, माजी सदस्या मिना सोंडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, निवृत्त पोलीस अधिकारी अरुण सोंडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक शहाणे, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, प्रकाश सोंडे, निलेश उबाळे यांसह आदी उपस्थित होते, तर शिक्रापूर मधील विजेच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाची विद्युत वितरण विभागाने दखल घेत समस्य्या सोडवल्याने ग्रामस्थांनी विद्युत वितरण विभागाने आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

9 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

9 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

9 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

9 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

13 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

13 तास ago