nirmala-navale
शिरूर : सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअिंग असणाऱ्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांना 300 मतांनी पराभूत केले आहे.
Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल…
निर्मला नवले या सोशल मीडियावर लोकप्रिय असून, त्यांचे अनेक रिल्स आणि व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहेत. मात्र, यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांची जादू चालू शकली नाही. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांना पराभूत केले आहे. निर्मला नवले यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
निर्मला नवले या कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. निर्मला नवले या राजकारणी असल्या तरी इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. निर्मला नवले यांनी आयटी इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे. काही वर्षांपूर्वी निर्मला नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. पण, निवडणुकीत त्यांची जादू चालू शकली नाही.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण 299 जागांपैकी 73 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपचे 20, शिवसेनेचे 7, राष्ट्रवादी काँग्रेसचे 27, ठाकरे गटाचे 2 आणि शरद पवार गटाचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे थंडावला होता. अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळताना दिसत आहे.
महिला सरपंचांच्या नावावर पतीचा कारभार आता चालणार नाही
रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…