शिरूर तालुका

पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे नुकसान…

टाकळी हाजी (अरुणकुमार मोटे): मीना शाखा कालवाच्या टेल ला असलेल्या शिरूर तालुक्यातील म्हसे गावच्या तळ्यात पाणी सुरू असताना कॅनॉलची नादुरुस्ती तसेच अधिकाऱ्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पाणी शेतात घुसले. यामध्ये म्हसे येथील शेतकरी निळू चोरे, रवी सदाफुले, विशाल ज्ञानेश्वर चोरे यांच्या शेतातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निळू चोरे यांच्या शेतातील कांद्याची काढणी सुरू असून कांदा शेतातच साठवला आहे. त्यात पाणी शिरले तसेच काढणी सुरू असलेल्या पिकातही पाणी घुसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करावा आणि नुकसानभरपाई मिळावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रविवारी (ता. २३) सकाळी शेतात आल्यानंतर पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली. परंतु, स्थळ पाहणी करण्यासाठी दुर्लक्ष केले गेले. जर लवकर लक्ष दिले असते तर नुकसान टाळता आले असते, असे निळू चोरे यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले असून, आमच्या कष्टावर पाणी फिरल्याने आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी साद शेतकऱ्यांकडून घातली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई प्रेस क्लबमधून तीन सदस्यांची हकालपट्टी; भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित बैठक ठरली कारणीभूत

मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…

8 तास ago

राज्यात पर्यटन विकासाला गती; पायाभूत सुविधा व सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…

8 तास ago

कोल्हापूरात तरुणींवर अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; मुख्य आरोपी अटकेत, साथीदार फरार

सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…

8 तास ago

महाराष्ट्रात कामगार कायद्यांचे नवे मसुदे जाहीर; ४५ दिवसांत हरकती-सूचना मागविल्या

मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…

8 तास ago

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…

9 तास ago

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…

9 तास ago