Ambadas Danwe
वाघाळेः विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (दि. २१) वाघाळे गावास भेट देऊन नुकासानीची पहाणी केली. गावातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसान भरपाई द्यावी, असे सुचित केले. यावेळी अनेक शेतकऱयांनी झालेल्या नुकसानीविषयी व्यथा मांडल्या.
वाघाळे गावात तीन वेळा ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी वाघाळे गावची पायी फिरून पहाणी केली. यावळी सोबत प्रांत संतोषकुमार देशमुख, शिवसेना जिल्हा अध्यक्ष माऊली आबा कटके, वाघाळे गावचे माजी सरपंच पप्पू भोसले, चेअरममन दिलीप थोरात, सामाजिक कार्यकर्ते सुरेश थोरात, सुर्यकांत बढे, विजय शेळके, शामराम शेळके, रमेश शेळके, उपसरपंच दादासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, वाघाळे गावामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण गावाला सरसकट नुकसान भरपाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय, संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
शिरूर (अक्षय टेमगिरे): देविदास बाळासाहेब सातकर यांच्या मालकीच्या उभ्या असलेल्या जेसीबी मशीनची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड…
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…