Ambadas Danwe
वाघाळेः विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (दि. २१) वाघाळे गावास भेट देऊन नुकासानीची पहाणी केली. गावातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसान भरपाई द्यावी, असे सुचित केले. यावेळी अनेक शेतकऱयांनी झालेल्या नुकसानीविषयी व्यथा मांडल्या.
वाघाळे गावात तीन वेळा ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी वाघाळे गावची पायी फिरून पहाणी केली. यावळी सोबत प्रांत संतोषकुमार देशमुख, शिवसेना जिल्हा अध्यक्ष माऊली आबा कटके, वाघाळे गावचे माजी सरपंच पप्पू भोसले, चेअरममन दिलीप थोरात, सामाजिक कार्यकर्ते सुरेश थोरात, सुर्यकांत बढे, विजय शेळके, शामराम शेळके, रमेश शेळके, उपसरपंच दादासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, वाघाळे गावामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण गावाला सरसकट नुकसान भरपाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय, संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…