Ambadas Danwe
वाघाळेः विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (दि. २१) वाघाळे गावास भेट देऊन नुकासानीची पहाणी केली. गावातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसान भरपाई द्यावी, असे सुचित केले. यावेळी अनेक शेतकऱयांनी झालेल्या नुकसानीविषयी व्यथा मांडल्या.
वाघाळे गावात तीन वेळा ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी वाघाळे गावची पायी फिरून पहाणी केली. यावळी सोबत प्रांत संतोषकुमार देशमुख, शिवसेना जिल्हा अध्यक्ष माऊली आबा कटके, वाघाळे गावचे माजी सरपंच पप्पू भोसले, चेअरममन दिलीप थोरात, सामाजिक कार्यकर्ते सुरेश थोरात, सुर्यकांत बढे, विजय शेळके, शामराम शेळके, रमेश शेळके, उपसरपंच दादासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, वाघाळे गावामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण गावाला सरसकट नुकसान भरपाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय, संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…
६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…
निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…
'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…
कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…