शिरूर तालुका

निमगाव म्हाळुंगी येथील माजी उपसरपंच रंजना काळे यांचे निधन

निमगाव म्हाळुंगी: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) गावच्या माजी उपसरपंच रंजना बबनराव काळे (वय ७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी (ता. ६) निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गावामध्ये त्यांच्यावर सोमवारी (ता. ७) शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रंजना काळे यांनी १९९० ते १९९५ यादरम्यान गावचे उपसरपंच पद भुषवले आहे. निमगाव म्हाळुंगी गावच्या विकासामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्या कार्यरत होत्या. पती बबनराव काळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी शेती व्यवसाय सांभाळला. शेती व्यवसायात त्या शेवटपर्यंत कार्यरत होत्या. अचानक जाण्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रमेश, सुरेश आणि गणेश या मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिले. रमेश हे इंडियन नेव्हीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. सुरेश आणि गणेश हे उद्योग व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. पुणे शहरातील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद गणेश काळे यांच्याकडे आहे.

दरम्यान, मुलगा गणेश यांच्या सोबत त्या देवदर्शनाला गेल्या होत्या. परतीच्या प्रवासात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. निमगाव म्हाळुंगी येथे गुरुवारी (ता. १०) सकाळी दशक्रिया विधी होणार आहे.

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांची उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड!

निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिकांनी जपला माणुसकीचा झरा…

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!

निमगाव म्हाळुंगी येथे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीची स्वच्छता करत केले वृक्षारोपण

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार प्रदान!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

24 मिनिटे ago

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानावरून काँग्रेस आक्रमक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश…

30 मिनिटे ago

गोंधळ’ चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी…

33 मिनिटे ago

बटाटे खाऊन वजन वाढत असं तुम्हालाही वाटतं का जाणून घ्या…

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल…

1 तास ago

च्युइंगम खाल्ल्याने खरंच चेहरा बारीक होतो का जाणून घ्या…

लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं…

1 तास ago

वेळीच टाळा रोज खाल्ले जाणारे हे फूड्स जे लिव्हरचं करतात गंभीर नुकसान

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हर अन्न पचवण्यासोबतच पचनासाठी…

1 तास ago