शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरुर शहराला जोडला जाणारा शिरुर बायपास ते पाबळ फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुमारे सहा महिन्यांपासुन सुरु असुन या रस्त्यांवर केलेल्या खोदकामामुळे शिरुरकर नागरीक हैराण झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात आलेला अंतर्गत भुयारी गटारीच्या कामामुळे सुरु असणारे काम आणी मध्यभागी टाकण्यात येत असलेले डिव्हायडर या मुळे शिरुरकरांना या रस्त्यावर वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या कामामुळे अनेक वाहने घसरून वारंवार अपघात देखील झालेले पहावयास मिळत आहे.
दुसरीकडे नगरपरिषदेमध्ये प्रशासक असल्याने या निर्धास्त ठेकेदारांवर अंकुश नसल्याने अतीशय संथ गतीने काम सुरु असल्याचे दिसत आहे .शिरुर नगरपरिषदेने पाबळ फाटा चौक ते माजी वसुंधरा महामार्ग आणी कुमार प्लाऊड ते सर्टिफाइड हायस्कूल अशा तीन टप्प्यांत सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून या रस्त्याच्या डांबरीकरण व फुटपाथ चे काम टप्प्याटप्प्यावर ठेकेदार नेमुन दिले आहे परंतु सदर ठेकेदारांकडुन अतिशय संथ गतीने काम सुरु असुन हा रस्ता पुर्णपणे खिळखिळा झाला आहे.
यातच शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने सातत्याने वाहतूक असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे सदर रस्त्याचे काम एकाचञ वेळी दुतर्फा सुरु असल्याने पडलेले खड्डे टाकलेला कच यातुन मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे टप्प्याटप्प्यावर काम करणे आवश्यक असताना एकाच वेळी रस्ता खोंदुन ठेवल्याने दोन्ही बाजूकडून वाहन चालवताना अनेक वेळा अपघात देखील होत आहे.त्यातच वयस्कर गृहस्थ महिला , आजारी नागरीकांना या रोजच्या अडचणी मुळे पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास होत आहे. शिरुरचे मुख्याधिकारी आता सदर ठेकेदारांवर काही कारवाई करणार का हे पहावे लागेल .
तर शिरूरनगरपरिषद प्रशासनाला आयोडेक्स बाम भेट देणार …
सदर रस्त्याच्या दुरुस्ती चे काम अतिशय संथ गतीने सुरु असुन शेकडो शिरुरकर या कामाला वैतागले आहे खरतर याबाबतीत मुख्याधिकारी यांनी ठेकेदारांना योग्य त्या सुचना दिल्या पाहीजेत पर्यायी कठोर कारवाई केली पाहीजे रोज या रस्त्यांवर जाणाऱ्या लोकांचे हाल लक्षात घेता या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला प्रतिकात्मक आयोडेक्स बाम देण्याचे आंदोलन करणार असल्याचे भुमीपुत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी सांगितले आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…