शिरूर (अरूणकुमार मोटे): पुणे जिल्हयातील शिरूर तालुक्यातील शिरुर शहरासह पंचक्रोशीचे आराध्य दैवत प्रभू श्री रामलिंग महाराजांच्या महाशिवरात्रीला होत असलेल्या यात्रा महोत्सवास यंदा एकावन्न वर्षे पूर्ण होत असल्याने यात्रेची मोठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या यात्रा उत्साहाच्या नियोजनाची बैठक शुक्रवार दि.१४ रोजी शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
शिरूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर श्री रामलिंग मंदिर असून, या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना खुद प्रभू श्री रामचंद्रांनी केल्याची आख्यायिका आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला या देवस्थानची मोठी यात्रा भरते. (दि. २५) फेब्रुवारीला शिरूर येथून रामलिंग येथे पालखीचे प्रस्थान होत आहे . (दि.२6) फेब्रुवारी रोजी रामलिंग येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रेचे आयोजन केले जाते .लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात. (दि. २७) रोजी भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली जाणार आहे.
यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आरोग्य विभाग, पंचायत समिती पोलीस विभाग, पशुसंवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण रुग्णालय शिरूर, महावितरण,रामलिंग देवस्थान, ग्रामपंचायत विभाग, यांच्याकडून यात्रेसाठी भाविकांना देण्यात येणाऱ्या सुखसुविधांची माहिती घेवून यात्रा सुरळीत व्यवस्थित पार पाडण्यासाठी सूचना केल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून भव्य अशा पार्किंगची सोय केलेली आहे. तसेच आरोग्य विभाग रुग्णवाहीकेसह सज्ज राहणार आहे.
यावेळी शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सरपंच अरुणराव घावटे माजी सरपंच तुषार दसगुडे ,उपसरपंच बाबाजी वर्पे, माजी सरपंच नामदेव जाधव ,खजिनदार पोपटराव दसगुडे, ट्रस्टी बलदेवसिंग परदेशी,रावसाहेब घावटे, नामदेवराव घावटे ,शिरूर नगरपरिषदेचे राहुल पिसाळ, पशुवर्धन विभागाचे श्रीमंदिलकर सर ,विस्तार आधिकारी आर .आर. राठोड ,आरोग्य विभागाचे राजेश कट्टीमनी, वाहतुक शाखेचे राजेंद्र वाघमोडे उपस्थित होते.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…