शिरूर तालुका

शिरूरचा सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही साखरझोपेत; पाऊस थांबला तरी रस्त्यांवरील खड्डे कायम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम शिरूर यांच्या हद्दीतील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळा संपत आला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र अजूनही साखरझोपेत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील प्रमुख रस्ते, अंतर्गत गाव रस्ते, तसेच शिरूर शहरातून ग्रामीण भागाकडे जाणारे मुख्य मार्ग हे अक्षरशः खड्ड्यांमध्ये विलीन झाले आहेत.

वाहनधारकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, दररोज किरकोळ ते गंभीर अपघात घडत आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ आश्वासनांचा पाऊस आणि प्रत्यक्षात शून्य काम अशी स्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, अधिकारी आलिशान गाड्यांमध्ये फिरतात, त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे त्यांना दिसतच नाहीत.” अशा उपरोधिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर आणि लोकांच्या चर्चांमध्ये उमटत आहेत.

शिरूर-आण्णापूर, शिरूर- निमोणे – गुनाट – निर्वी रोडवरील अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, दुचाकीस्वारांना विशेषतः मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर खड्ड्यांमुळे पाणी साचून रस्त्याचे रूपांतर लहान तळ्यात झाले आहे.

स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची तात्काळ शास्त्रीय पद्धतीने डांबरी दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.नागरिकांचा सवाल: “करोडो रुपयांचे निधी कुठे जातात?”शिरूर तालुक्याचे रस्ते पुन्हा प्रवासयोग्य कधी होणार? की सार्वजनिक बांधकाम विभाग अजून काही दिवस गोड झोपेतच राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

4 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

11 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

11 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

11 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

11 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

11 तास ago