लक्ष्मण व राधाने मिळवली परिस्थितीशी झगडत खाकी
शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पोलीस भरतीचे निकाल जाहीर झालेले असून शिरुर तालुक्यातील एक पती पत्नी एकाच वेळी पोलीस भरती झालेले असताना शिक्रापूर येथील एका बहिण भावाने देखील परिस्थितीशी दोन हात करत पोलीस भरती होत खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण केले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आलेले नारायण सोळंके व गंगा सोळंके हे मुळचे जालना जिल्ह्यातील सावरगाव बुद्रुकचे त्यांची परिस्थिती हलाकीची त्यांना लक्ष्मण, विजय व राधा हि तीन मुले सुरुवातीपासून मुलांना शिक्षण देण्यासाठी दोघांनी खूप कष्ट केले. वडील नारायण हे चहाचा गाडा चालवून तर आई गंगा हि शेतात काम करुन कुटुंब चालवू लागले तर मुले मोठी झाल्यावर शिक्षणासह काही काम धंदा करु लागली.
लक्ष्मण दुचाकी दुरुस्तीचे तर विजय कंपनीत काम करु लागला मात्र दुचाकी दुरुस्तीचे काम करत असताना लक्ष्मण मन लावून अभ्यास करत असल्याचे पाहून अनेकांनी त्याची थट्टा केली परंतु काहीही झाले तर आपण पोलीस दलात जायचेच हे लक्ष्मणने ठरवले तर राधा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या भावाचेच पुस्तके वापरुन आपण देखील पोलीस व्हावे असे तिला वाटू लागले तिने अभ्यास सुरु केला तर लक्ष्मणने २०२१ पोलीस भरतीची परीक्षा दिली मात्र त्याला अपयश आले परंतु त्यांने जिद्द हरली नाही.
सध्या लक्ष्मण व त्याची लहान बहिण राधा दोघांनी देखील लोणीकंद येथील डिफेन्स करिअर अकादमीमध्ये पोलीस भरतीचा सराव केला आणि नुकतीच पार पडलेल्या परीक्षेत मन लावून अभ्यास करुन सामोरे गेले असताना सध्या जाहीर झालेल्या पोलीस भरती मध्ये लक्ष्मण सोळंके व राधा सोळंके या दोघा बहिण भावांनी यश संपादित करुन आपल्या सह आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करत थट्टा उडवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे, तर आपली मुळे पोलीस भरती झाल्याचे ऐकून दोघांच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले तर याबाबत बोलताना आम्ही केलेल्या कष्टाचे मुलांनी चीज तर केले. मात्र मुलांचे यश पाहून आम्ही आमचे कष्ट सुद्धा विसरुन गेलो असल्याचे लक्ष्मण व राधा यांचे वडील नारायण व आई गंगा यांनी सांगत आपल्या मुलांच्या यशा बद्दल मुलांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
पुढील जिद्द देखील कायम ठेवणार आहे…
आमच्या आई वडिलांच्या कष्टाची आम्हाला जाणीव तसेच काहींनी केलेली चेष्टा यामुळे आम्ही शालेय शिक्षणाबरोबर पोलीस भरतीमध्ये जिद्दीने यश संपादित केले असून यापुढील काळात देखील आम्ही पुढील परीक्षांना सामोरे जाणार असल्याचे लक्ष्मण सोळंके व राधा सोळंके यांनी सांगितले.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…