शिरूर तालुका

विद्यार्थ्यांनी गरज ओळखून पावले टाकावी: उमाकांत पिंगळे

मुखईत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हुतात्म्यांच्या वंशजांचे मार्गदर्शन

शिक्रापूर: सध्या ऑक्सिजन मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून त्यासाठी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याने आपली गरज ओळखून आपण पावले टाकावी अन्यथा भविष्यामध्ये ऑक्सिजनच्या नळकांड्या घेऊन आपल्याला समाजामध्ये वावरावं लागेल, असे मत हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे यांनी केले.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे गुरुजी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान उमाकांत पिंगळे यांनी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे या क्रांतीकारकाचा जिवनपट विद्यार्थ्यांना उलगडून सांगित पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहीजे असा संदेश पिंगळे यांनी दिला. तसेच क्रांतिकारक मंगल पांडे यांच्या पासून सुरु झाली क्रांतिकार्याची प्रेरणा सुभाषचंद्र बोस यांच्या पर्यंत कशाप्रकारे येऊन ठेपली याचे दिलखुलास असे वर्णन केले.

तसेच देशभक्तीपर राष्ट्रगीत, वंदे मातरम ही बंगालची आपल्या भारताला मिळालेली फार मोठी देणगी असल्याचे देखील उमाकांत पिंगळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी पिंगळे गुरुजींच्या पदस्पर्शाने आपली शाळा व आपण सर्वच खर्‍या अर्थाने धन्य झालो असल्याची भावना व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनोज धिवार यांनी केले तर किशोर गोगावले यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

14 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

14 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

17 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

17 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

17 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

17 तास ago