शिरूर तालुका

शिक्रापूरची वेळ नदी ऐन उन्हाळ्यात तहानलेली

वेळ नदीला चासकमान पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वेळ नदी पूर्णपणे कोरडी ठणठणीत झालेली असल्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली असल्यामुळे गावाला पायाच्या संकटाचा सामना करण्याची वेळ आल्याने वेळ नदीला चासकमान कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी शिक्रापूर ग्रामपंचायत सह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथून वाहणाऱ्या वेळ नदीच्या पाण्यामुळे शिक्रापूर गावासह परिसरातील वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच येथील अनेक वाड्या वस्त्यांवरील शेतीचे तसेच नागरिकांचे पाण्याचे स्त्रोत अवलंबून आहे, या वेळ नदीला पाणी असल्यास या परिसरातील सर्व विहिरींची पाण्याची पातळी वाढलेली असते त्यामुळे नागरिकांना देखील शेतीतील पिकांना पाणी देणे शक्य होत असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी सोय होत असते. तसेच या नदीचे बंधारे भरलेले असल्यास गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पातळी वाढलेली असल्यामुळे ग्रामस्थांना योग्य पद्धतीने पाणी वाटप होत असते.

परंतु सध्या वेळ नदी पूर्णपणे कोरडी पडलेली असून या नदीवर असलेले शिक्रापूर परिसरातील सर्व बंधारे देखील कोरडे पाडलेले आहे तसेच उन्हाची तीव्रता वाढत चाललेली असल्यामुळे आता नागरिकांना पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे. त्यामुळे येथील वेळ नदीला चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी शिक्रापूर सह आजूबाजूच्या गावांच्या ग्रामपंचायत तसेच शेतकरी संघटना तसेच काही संघटनांच्या माध्यमातून चासकमान विभागाकडे करण्यात येत आहे.

यापूर्वी अनेकदा याबाबत चासकमान विभागाकडे पत्रव्यवहार करुन देखील वेळ नदीला पाणी सोडण्यात आलेले नसल्याने शेतकरी संघटनेने चासकमानच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. सध्या वेळ नदीला पाणी नसल्याने अनेक विहिरीची पातळी खालावली असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहण्याची चिन्हे निर्माण झाली तातडीने वेळ नदीमध्ये चासकमान कालव्याचे पाणी सोडावे अशी मागणी करण्यात येत आहे.

चासकमान मधून पाणी सोडण्यात आलेले आहे; सुनील म्हस्के (शाखा अधिकारी)

शिक्रापूर ग्रामपंचायत तसेच काही संघटना यांनी निवेदन दिलेले आहे, मात्र चासकमान मधून वेळ नदीला पाणी सोडण्यात आलेले असून लवकरच शिक्रापूर सह तळेगाव ढमढेरेला पाणी पोहचेल चासकमान विभागाचे शाखा अधिकारी सुनील म्हस्के यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

12 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

13 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

13 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

16 तास ago