क्राईम

ऊसतोड कामगार पुरवण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची चौदा लाखांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ऊस तोड ठेकेदारास ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो असे म्हणून तब्बल चौदा लाख चाळीस हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे ज्ञानेश्वर अंकुश चव्हाण याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील संतोष भुजबळ यांचा ऊस तोडणी कामगार घेऊन ऊस कारखान्याला पुरवण्याचा व्यवसाय असून ते ऊस तोडणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणहून ऊस तोड कामगार आणत असतात त्यांच्या व्यवसायातून त्यांची ज्ञानेश्वर चव्हाण या व्यक्तीसोबत ओळख झाली.

त्यांनतर चव्हाण यांनी ऊसतोड कामगारांना ॲडव्हान्स मध्ये पैसे देण्यासाठी काही पैशांची वेळोवेळी मागणी केली असता संतोष भुजबळ यांनी वेळोवेळी ज्ञानेश्वर चव्हाण यांना तब्बल 14 लाख 40 हजार रुपये रोख तसेच बँकेच्या माध्यमातून दिले. मात्र त्यानंतर देखील कामगार येत नसल्याने चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला. तसेच संतोष भुजबळ हे चव्हाणचे मूळ गावी गेले असता तेथे देखील तो भेटला नाही नंतर फोन देखील उचलले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे भुजबळ यांच्या निदर्शनास आले.

याबाबत संतोष विठोबा भुजबळ (वय ४०) रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर)  जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ज्ञानेश्वर अंकुश चव्हाण रा. खोरदड ता. धुळे जि. धुळे या इसमावर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले तर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष मारकड हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago