शिरूर (अरुणकुमारमोटे): शिरूर तालुक्यातील सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात शुक्रवारी (ता.९) दुपारनंतर दोन रानगवे दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे . मुंजाळवाडी येथील अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या एका शेतात हे गवे फिरताना नागरिकांनी पाहिले. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या गव्यांचे चित्रीकरण देखील केले आहे.
या घटनेनंतर कवठे येमाई चे माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वनरक्षक नारायण राठोड आणि वनमजूर हनुमंत कारकुड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
तदनंतर पुन्हा शनिवारी (ता.१०) गव्यांचे येडेबो-हाडे वस्ती परिसरातही दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी सतर्क राहून शेतात काम करावे. रानगवे आढळल्यास घाबरून जाऊ नये, तसेच त्यांच्याकडे जाण्याचा अथवा त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रसंगी त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, जेणेकरून योग्य त्या उपाययोजना वेळेवर करता येतील.
निळकंठ गव्हाणे
वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…