शिरूर तालुका

सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात दोन रानगवे दिसल्याने खळबळ

शिरूर (अरुणकुमारमोटे): शिरूर तालुक्यातील सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात शुक्रवारी (ता.९) दुपारनंतर दोन रानगवे दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे . मुंजाळवाडी येथील अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या एका शेतात हे गवे फिरताना नागरिकांनी पाहिले. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या गव्यांचे चित्रीकरण देखील केले आहे.

या घटनेनंतर कवठे येमाई चे माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वनरक्षक नारायण राठोड आणि वनमजूर हनुमंत कारकुड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

तदनंतर पुन्हा शनिवारी (ता.१०) गव्यांचे येडेबो-हाडे वस्ती परिसरातही दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी सतर्क राहून शेतात काम करावे. रानगवे आढळल्यास घाबरून जाऊ नये, तसेच त्यांच्याकडे जाण्याचा अथवा त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रसंगी त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, जेणेकरून योग्य त्या उपाययोजना वेळेवर करता येतील.

निळकंठ गव्हाणे

वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

8 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

16 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

16 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

16 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

16 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

16 तास ago