शिरूर तालुका

शिरुर शहरात पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरांनी हिसकावला

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरात सोनंसाखळी चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असुन वर्दळीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन पायी चालतअसणाऱ्या किंवा दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या मुली व महिलांच्या गळ्यातील सोनंसाखळी करण्याचे प्रकार सध्या शिरुर शहरात वाढत चालले आहेत. (दि २६) जानेवारी २०२४ रोजी मैत्रिणीसोबत पायी चाललेल्या एका महिलेचे मिनी मंगळसुत्र दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी जबरदस्तीने ओढुन चोरुन नेले आहे. याबाबत शितल विशाल झनकर (वय २७) या महिलेने शिरुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि २६) जानेवारी २०२५ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास शिरुर शहरातील जोशीवाडीच्या हद्दीत हनुमान मंदिर ते जुना महामार्गावर असलेल्या गणेश दुध डेअरीच्या समोरुन फिर्यादी तिच्या दोन मैत्रीणीसोबत पायी जात असताना दुचाकीवरुन दोन इसम आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने गळयातील मिनी मंगळसुत्र जबरदस्तीने ओढुन चोरी करुन नेले आहे. त्यामुळे दोन अनोळखी व्यक्ती विरोधात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

6 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

6 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

7 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

12 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

12 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

12 तास ago