शिरूर तालुका

शिरुर शहरात पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरांनी हिसकावला

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरात सोनंसाखळी चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असुन वर्दळीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन पायी चालतअसणाऱ्या किंवा दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या मुली व महिलांच्या गळ्यातील सोनंसाखळी करण्याचे प्रकार सध्या शिरुर शहरात वाढत चालले आहेत. (दि २६) जानेवारी २०२४ रोजी मैत्रिणीसोबत पायी चाललेल्या एका महिलेचे मिनी मंगळसुत्र दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी जबरदस्तीने ओढुन चोरुन नेले आहे. याबाबत शितल विशाल झनकर (वय २७) या महिलेने शिरुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि २६) जानेवारी २०२५ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास शिरुर शहरातील जोशीवाडीच्या हद्दीत हनुमान मंदिर ते जुना महामार्गावर असलेल्या गणेश दुध डेअरीच्या समोरुन फिर्यादी तिच्या दोन मैत्रीणीसोबत पायी जात असताना दुचाकीवरुन दोन इसम आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने गळयातील मिनी मंगळसुत्र जबरदस्तीने ओढुन चोरी करुन नेले आहे. त्यामुळे दोन अनोळखी व्यक्ती विरोधात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

46 मिनिटे ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

49 मिनिटे ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

53 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

2 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

22 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

23 तास ago