शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील जांबुत येथील तिसरा बिबट्या जेरबंद

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील जांबुत येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी ( दि.) रोजी पहाटे बिबट्या जेरबंद झाला. हल्ल्याच्या घटनांनंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नर संवर्गातील सहा ते सात वर्षे वयोमान असणारा तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागला यश आले आहे.

शिरुर तालुक्यातील जांबुत येथील जोरी मळा येथे सुदाम जोरी यांच्या वस्तीवर वनविभागाने सावज असलेला पिंजरा लावला होता. बिबट्याच्या हल्ल्यात सचिन जोरी,पुजा नरवडे यांंना जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून वनविभागाकडून जांबुत परिसरात बिबट्यांंना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. जोरी मळा येथे पिंजऱ्यात अडकलेला हा तिसरा बिबट्या आहे.

जांबुत परिसरात वनविभागाने आठरा पिंजरे लावलेले आहेत. तर 20 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले होते. त्यामध्ये दोन ठिकाणी बिबट्याचे फोटो मिळाले आहेत. बिबट्याचा वावर, पाऊलखुणा द्वारे पिंजऱा लावण्यात येतो. जोरीमळा येथील कॅमेरा ट्रॅप मध्ये बिबट्या कैद झाला होता. त्यानुसार त्या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यांत बिबट्या अडकला. या बिबट्याची माणिकडोह येथे बिबट निवारण केंद्रात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

1 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

1 तास ago

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

6 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

6 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

6 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

23 तास ago