शिरूर तालुका

वढू बुद्रुकला बिबट्यांच्या पिलांच्या अफवेने खळबळ; काय आहे पाहा…

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे गेली दोन वर्षात अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाले असताना शुक्रवारी (ता. १) सकाळच्या सुमारास येथील शेतात काम करणाऱ्या नागरिकांना बिबट्या सदृश प्राण्याची पिल्ले दिसून आल्याने एकच खळबळ उडाली.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील आदित्य भंडारे यांच्या उसाच्या शेतात काही नागरिक काम करत असताना त्यांना बिबट्या सदृश प्राण्याची पिल्ले दिसून आली. दरम्यान येथील सर्व नागरिक घाबरून गेले. याबाबतची माहिती वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुका सचिव शेरखान शेख यांना मिळताच शिरुर वनविभागाचे वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता तेथे शेतात आढळून आलेली पिल्ले बिबट्याची नसून रानमांजराची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

परंतु, गावामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे आणि काही नागरिकांवर बिबट्याचे हल्ले केलेले असल्याने आम्ही घाबरून गेल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

वढू बुद्रुक येथे आढळून आलेल्या पिल्लांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेले असून, नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन वनरक्षक बबन दहातोंडे यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

6 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

6 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

6 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

6 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

8 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

8 तास ago