पाबळ (सुनिल जिते): कान्हूर मेसाई(ता. शिरूर) हद्दीतील वाड्या-वस्त्यांवरील जलस्रोतांची “पाणीपातळी खालावल्याने येथील नागरिकांकडून त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव शिरूर पंचायत समितीकडे देण्यात आलेला असल्याची माहिती उपसरपंच योगेश पुंडे यांनी दिली.
मागील सलग दोन वर्षांपासून कान्हूर मेसाई ग्रामपंचायत हद्दीतील तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. मागील वर्षी मान्सूनपूर्व, मान्सून व परतीचा पाऊस अल्प प्रमाणात पडला होता. यामुळे जमिनीतील पाणीपातळीत थोडीफार वाढ झाली होती. मात्र, काही दिवसांपासून दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत असून, नैसर्गिक जलस्रोत आटले आहे. जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट होऊन गावच्या पूर्वेकडील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे शासनाने या भागात त्वरित टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
जलजीवन मिशनची कामे अपूर्ण
मागील दोन वर्षांपासून केंद्र शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी या योजना पूर्ण झालेल्या नाहीत. अनेक ठिकाणी ही कामे अर्धवट आहेत. भविष्यातील भीषण पाणीटंचाईकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही, असे रखडलेल्या अर्धवट कामावरून निदर्शनास येत आहे.
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…