पाबळ (सुनिल जिते): कान्हूर मेसाई(ता. शिरूर) हद्दीतील वाड्या-वस्त्यांवरील जलस्रोतांची “पाणीपातळी खालावल्याने येथील नागरिकांकडून त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव शिरूर पंचायत समितीकडे देण्यात आलेला असल्याची माहिती उपसरपंच योगेश पुंडे यांनी दिली.
मागील सलग दोन वर्षांपासून कान्हूर मेसाई ग्रामपंचायत हद्दीतील तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. मागील वर्षी मान्सूनपूर्व, मान्सून व परतीचा पाऊस अल्प प्रमाणात पडला होता. यामुळे जमिनीतील पाणीपातळीत थोडीफार वाढ झाली होती. मात्र, काही दिवसांपासून दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत असून, नैसर्गिक जलस्रोत आटले आहे. जमिनीतील पाणीपातळीत मोठी घट होऊन गावच्या पूर्वेकडील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे शासनाने या भागात त्वरित टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
जलजीवन मिशनची कामे अपूर्ण
मागील दोन वर्षांपासून केंद्र शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. मात्र, अद्याप अनेक ठिकाणी या योजना पूर्ण झालेल्या नाहीत. अनेक ठिकाणी ही कामे अर्धवट आहेत. भविष्यातील भीषण पाणीटंचाईकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही, असे रखडलेल्या अर्धवट कामावरून निदर्शनास येत आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…