इतर

बूस्टर डोसचा कालावधी झाला कमी: किती तो पहा

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कोरोना प्रतिबंधक लसीच्या बुस्टर डोसचा कालावधी कमी केला आहे. दुसऱ्या डोसनंतर ९ महिन्यांनी बुस्टर डोस दिला जात होता. हा कालावधी कमी करत ६ महिन्यांवर आणण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली.

आरोग्य मंत्रालयानं निवदेनात म्हटलं की, यापूर्वी दुसऱ्या डोसनंतर ९ महिन्यांनी अर्थात ३९ आठवड्यांनंतर बूस्टर डोस दिला जात होता. पण जगभरात कोरोनाच्या लसींबाबत जे नवे संशोधन सुरु आहे. त्यानुसार नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रुपच्या (NTAGI) स्टँडिंग टेक्निकल सब कमिटीनं (STSC) हे निर्देशित केलंय की, बूस्टर डोसचा कालावधी ९ महिन्यांवरुन ६ महिन्यांवर अर्थात २६ आठवड्यांवर आणण्यात यावा.

unique international school

मुख्तार अब्बास नक्वी यांचा अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा राजीनामा
त्यामुळं आता १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यांनी तिसरा डोस अर्थात बूस्टर डोस घेता येईल. हा बूस्टर डोस या लाभार्थ्यांना प्रायव्हेट कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरवर (CVCs) अर्थात खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क घेता येईल. तर ६० वर्षांवरील नागरिक आणि फ्रन्ट लाईन वर्कर्सना सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत बुस्टर डोस घेता येईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

5 मिनिटे ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

8 मिनिटे ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

11 मिनिटे ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

22 मिनिटे ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

2 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

2 तास ago