इतर

शेतकऱ्यांसाठी ‘या’ 5 योजना ठरतायेत वरदान…

मुंबई: आपल्या देशात जवळपास प्रत्येक वर्गासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. ज्यांचा उद्देश गरजू आणि गरीब वर्गाला मदत करणे हा आहे. यामध्ये आरोग्य, रोजगार, विमा, रेशन अशा अनेक योजनांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबविल्या जात आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक व इतर फायदे दिले जातात. त्याचबरोबर सध्या या योजनांचा लाभही मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहेत.

आज आम्ही तुम्हाला देशात सुरु असलेल्या अशा ५ योजनांबद्दल सांगणार आहोत. ज्या शेतकऱ्यांसाठी आहेत आणि शेतकरी त्यांचा लाभ घेऊ शकतात. यापैकी ३ योजना या केंद्र सरकारच्या असून त्या सर्व राज्यांमध्ये लागू आहेत. मात्र दोन योजना या ठराविक राज्यांमध्ये लागू आहेत.

unique international school

१) पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकार चालवत असून देशभरातील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात, जे प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवले जातात.

२) पीएम किसान मानधन ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. ज्यामध्ये 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळते. परंतु या आधी, तुम्हाला तुमच्या वयानुसार प्रीमियम भरावा लागेल. तुम्ही 18 ते 40 वर्षे वयोगटातील असल्यास अर्ज करु शकता. जर तुम्ही 18 वर्षांचे असाल तर तुम्हाला दरमहा 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

३) प्रधानमंत्री कुसुम योजना या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरपंप बसवण्यासाठी 60 टक्के अनुदान आणि 30 टक्के कर्ज देत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सौर पंप किंवा ट्यूबवेल बसवू शकतात. तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपला ठेवा विठूरायाचे हे सुंदर स्टेटस; लाईक, शेअर्सचा पडेल पाऊस

४) कूपनलिका योजना फक्त उत्तर प्रदेशातील या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो, कारण ही योजना यूपी सरकार चालवते. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात कूपनलिका बसवू शकतात. अशाच प्रकारची योजना इतर राज्यांमध्येही चालू होऊ शकते.

५) रयथू बंधू योजना तेलंगणा सरकार ही योजना अतिशय लोकप्रिय योजना असून अनेक सरकारं या योजनेचा अभ्यास करत आहेत. या योजनेंतर्गत, राज्य सरकार पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वार्षिक 10,000 रुपये आर्थिक सहाय्य पाठवते. जर तुमच्या नावावर स्वतःची जमीन असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…

4 तास ago

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

17 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

23 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

23 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

23 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

24 तास ago