शिरुर तालुक्यात जमिनीच्या वादातून तिघांना मारहाण

क्राईम

शिक्रापूर: रांजणगाव सांडस (ता. शिरुर) येथील मनोज गवळी यांची जमीन राजाराम रणदिवे यांनी खंडाने केलेली असून सदर जमीन राजाराम हे ट्रॅक्टर चालक उमेश शितोळे याच्या मदतीने नांगरत असताना संतोष गवळी व शांताराम गवळी हे दोघे तेथे आले त्यांनी हि जमीन आमची आहे आमचा भाऊ मनोजचा काहीही संबंध नाही, असे म्हणून ट्रॅक्टर चालक व रणदिवे यांना शिवीगाळ, दमदाटी करत दगडाने मारहाण करुन जखमी केले. यावेळी राजाराम यांचा भाऊ राहुल रणदिवे हा भांडणे सोडविण्यासाठी आला असता त्याला देखील दोघांनी मारहाण केली.

याबाबत राजाराम रणदिवे (वय २६) रा. रांजणगाव सांडस (ता. शिरुर) जि. पुणे याने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी संतोष बाळू गवळी व शांताराम बाळू गवळी दोघे रा. रांजणगाव सांडस (ता. शिरुर)जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस करत आहे.