crime
नवी दिल्ली: कालकाजी पोलीस स्टेशन परिसरातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने रागाच्या भरात आपल्या दोन वर्षांच्या मुलाला तिसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले. त्यानंतर आरोपीने स्वतःही तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली.
दोघांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असताना त्यांना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. आरोपीची पत्नी त्याच्यासोबत सासरच्या घरी जात नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने हा प्रकार केला. कालकाजी पोलीस ठाण्याने गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
दक्षिण पूर्व जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालकाजीच्या सर्वोदय कॅम्पमध्ये शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. ओखला येथे राहणाऱ्या मानसिंगचे काही वर्षांपूर्वी सर्वोदय कॅम्पमध्ये राहणाऱ्या नगीना यांच्या मुलाची मुलगी पूजासोबत लग्न झाले होते.
आरोपी पती मानसिंगला दारु पिण्याचे व्यसन असून तो कोणताही व्यवसाय करत नाही. त्यामुळे त्याचे पत्नी पूजासोबत जमत नव्हते. पूजा बहुधा तिच्या माहेरच्या घरी राहायची. शुक्रवारी रात्री आरोपी मानसिंग दारूच्या नशेत सासरच्या घरी पोहोचला. त्याने पूजाला घरी जायला सांगितले.
पूजाने घरी जाण्यास नकार दिल्याने आरोपीने तिचा मुलगा आदित्य याला तिसऱ्या मजल्यावर नेले आणि खाली फेकले. यानंतर आरोपीने स्वतःही जमिनीवर खाली उडी मारली. आदित्य आणि मान सिंह यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दोघांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसिंगला खूप दुखापत झाली असून मुलाची प्रकृती गंभीर आहे.
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…
मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…
मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…