क्राईम

शिक्रापुरात जुन्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे एका व्यक्तीला जुन्या भांडणाच्या वादातून लोखंडी सळईने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सागर ज्ञानेश्वर येवले व अतुल साहेबराव धुमाळ या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सायकर मळा येथे राहणाऱ्या दत्तात्रय धुमाळ व अतुल धुमाळ यांचे मूळ गावी मोराची चिंचोली येथे यापुर्वू काही वाद झालेले होते. त्यानंतर 30 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अतुल धुमाळ व त्याचा मित्र सागर येवले या दोघांनी दत्तात्रय यांना फोन करुन तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून मलठण फाटा येथे बोलावून घेतले. त्यानंतर दतात्रय सदर ठिकाणी आले असता दोघांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत तू आणि तुझ्या भावाने मला गावात मारले ना तुला दाखवतोच असे म्हणून लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी करुन दुचाकीहून पळून गेले.

याबाबत दत्तात्रय भाऊसाहेब धुमाळ (वय ३९) रा. सायकर मळा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. मोराची चिंचोली (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सागर ज्ञानेश्वर येवले व अतुल साहेबराव धुमाळ दोघे रा. मोराची चिंचोली (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुन्ना मुत्तनवार हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

3 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

4 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

4 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

4 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

4 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

4 तास ago