शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे एका व्यक्तीला जुन्या भांडणाच्या वादातून लोखंडी सळईने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सागर ज्ञानेश्वर येवले व अतुल साहेबराव धुमाळ या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सायकर मळा येथे राहणाऱ्या दत्तात्रय धुमाळ व अतुल धुमाळ यांचे मूळ गावी मोराची चिंचोली येथे यापुर्वू काही वाद झालेले होते. त्यानंतर 30 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अतुल धुमाळ व त्याचा मित्र सागर येवले या दोघांनी दत्तात्रय यांना फोन करुन तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून मलठण फाटा येथे बोलावून घेतले. त्यानंतर दतात्रय सदर ठिकाणी आले असता दोघांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत तू आणि तुझ्या भावाने मला गावात मारले ना तुला दाखवतोच असे म्हणून लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी करुन दुचाकीहून पळून गेले.
याबाबत दत्तात्रय भाऊसाहेब धुमाळ (वय ३९) रा. सायकर मळा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. मोराची चिंचोली (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सागर ज्ञानेश्वर येवले व अतुल साहेबराव धुमाळ दोघे रा. मोराची चिंचोली (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुन्ना मुत्तनवार हे करत आहे.
सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…