क्राईम

करंदीत पाटबंधारेच्या कर्मचाऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्यामध्ये पाटबंधारे प्रकल्प उपविभाग क्रमांक पाचचा कर्मचारी बाळू नामदेव गुंडाळ या कर्मचाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याला पाणी आलेले असल्याने सदर कालव्याच्या गेटवर नियंत्रण करणारे काही कर्मचारी बाळू गुंडाळ सह आदी कर्मचारी काम करत असताना सकाळच्या सुमारास बाळू गुंडाळ हे कर्मचारी बराच वेळ अन्य कर्मचाऱ्यांना दिसले नाही. त्यामुळे तेथील अन्य कर्मचाऱ्यांनी गुंडाळ यांना आवाज दिला. तसेच आजूबाजूला पाहणी केली असता काही वेळाने बाळू गुंडाळ हे पाण्यात बुडून मयत झाल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस हवालदार श्रावण गुपचे, करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, चिमाजी साबळे यांसह आदींनी सदर ठिकाणी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदन साठी पाठवून दिला. या घटनेत बाळू नामदेव गुंडाळ (वय ४५) रा. पडाळवाडी राजगुरुनगर ता. खेड जि. पुणे यांचा मृत्यू झाला.

याबाबत राहुल नारायण थिगळे (वय ३4) रा. राजगुरुनगर ता. खेड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

7 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

7 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

7 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

7 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

8 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

8 तास ago