क्राईम

दहिसरमध्ये भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यु

मुंबई: मुंबईच्या रस्त्यांवरील वाढती वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच दहिसर पूर्व परिसरात एक अत्यंत धक्कादायक अपघात घडला असून अज्ञात वाहनाने चिरडल्याने एका स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पूर्व येथील चौकीजवळ दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्कूटरवरून जात असलेला एक व्यक्ती अचानक तोल जाऊन रस्त्यावर पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकचे टायर थेट त्या स्कूटरस्वाराच्या डोक्यावरून गेले. या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

अपघातानंतर मृतदेह काही वेळ रस्त्यावरच पडून होता. मात्र, मदतीसाठी पुढे येण्याऐवजी काही जणांनी मोबाईलमध्ये या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले. काही तरुण ‘हेल्मेट वापरा’ असा संदेश देत व्हिडिओ आणि रिल्स तयार करत असल्याचा प्रकारही समोर आला. मृतदेह झाकण्यासाठी साधा कापड टाकण्याचीही तसदी कुणी घेतली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून अधिक तपास सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

12 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

17 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

17 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

17 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

17 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

19 तास ago