क्राईम

सख्खा भाऊच झाला भावाचा वैरी, धारदार कोयत्याचा धाक भावाला दिली जीवे मारण्याची धमकी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले दोन भाऊ काही कारणास्तव एकमेकांच्या जीवावर उठले आहे. धारदार कोयत्याच्या सहाय्याने धाक दाखवत भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने भावाने भिती पोटी शिरूर पोलिस स्टेशन गाठून पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गोलेगाव (ता. शिरूर) येथील श्रीकांत बबन भोगावडे (वय 38) यांना त्यांचा सख्का भाऊ संदिप बबन भोगावाडे याने अज्ञात कारणावरून गोलेगाव येथे शिविगाळ केली आहे. त्यानंतर पुन्हा भाऊ संदिप याने गुजर मळा शिरूर येथील निर्माण प्राईड येथे येत श्रीकांत यांच्या फ्लॅटच्या समोर उस तोडायचा धारधार कोयता घेवुन आरडोओरडा करून श्रीकांत यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देवुन त्यांच्या घराच्या समोर दहशत करत होता. त्यामुळे श्रीकांत याने शिरूर पोलिस स्टेशनमध्ये सख्या भावावर आर्म ऍक्ट 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार विनोद मोरे हे करत आहे.

जमिनीच्या, प्रॉप्रटीच्या वादातून भावाभावांमध्ये मोठे वाद निर्माण होत असून हे वाद गावागावातच मिटले गेले पाहीजे, अन्यथा भाऊ भावाचा पक्का वैरी झाल्याशिवाय राहणार नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago