शिरुर (अरुणकुमार मोटे): प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसाठी कैलास वसंत कर्डिले हे (दि. १३) जुलै रोजी पासून उपोषणास बसले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासनाने व आय. एफ. बी कंपनीने दखल न घेतल्यामुळे निषेध म्हणून शिरुर तहसिल कार्यालयासमोर तरुणांनी सामुहिक मुंडन केले आहे. यावेळी मोठया प्रमाणात महीला वर्ग हजर होता.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे रांजणगाव टप्पा कं. ३ मध्ये आय एफ बी रेफ्रिजरेशन लि. कंपनीचे काम झालेले असून स्थानिक प्रकल्पबाधितांना प्राधान्याने सदर कंपनी कामे देत नसल्याने कैलास वसंत कर्डिले यांचे (दि. १३) जुलै रोजीपासून उपोषण आंदोलन चालू केले आहे.
प्रशासनाकडून उपोषण थांबविण्याकरिता धाक, दडपण आणण्याचा सतत प्रयत्न चालू आहे. परंतू, आंदोलक, ग्रामस्थ व प्रकल्पबाधित यांच्या मागण्या या कायदेशिर स्वरूपाच्या असतानाही सदर मागण्यांबाबत कोणताही विचार केला जात नसल्याने तहसिल कार्यालयासमोर सामुहीक मुंडण करून जाहीर निषेध नोंदविला आहे. यावेळी विकास सरोदे, मयुर विलास सरोदे व आंदोलकांनी सामूहिक मुंडण केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर, निलेश वाळुंज, ॲड. उदय सरोदे, शशिकांत निरवने, दीपक सरोदे, अशाल शेळके, दत्तात्रय कुंडलिक, विभाग प्रमुख पंकज शेळके,रंगनाथ गायकवाड, राहुल सरोदे, अजय सरोदे, अभिजीत घावटे, निशांत सरोदे, धनंजय घावटे, रोहन सरोदे, अक्षय कर्डीले, तृप्ती सरोदे, आनिता घावटे, निलम सरोदे, भाग्यश्री कर्डिले, शोभा कर्डिले, कांता निरवणे, जिजाबाई सरोदे, अंजली सांगळे, वैशाली सरोदे, दिपाली सरोदे, रुक्मिणी गायकवाड, सुरेखा घावटे, श्रुतिका निरवने, शिल्पा घावटे, लीलाबाई कुंडलिक, ललिता सरोदे, दिपाली सरोदे, वत्सला घावटे, संगीता घावटे, शकुंतला इसवे, साधना बाराते, मंगल सरोदे, सुरेखा निरवणे, हरणाबाई गायकवाड, उषा निरवणे, योगिता कर्डिले, सुवर्णा घावटे मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…
रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…