सहा जण अटकेत
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण गावाच्या हद्दीत फॉरेस्टच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर तीनपत्ती जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई (दि. ५) ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मलठण गावातील फॉरेस्टच्या मोकळ्या जागेत सापळा रचून जुगार खेळणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले. याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे रितसर फिर्याद संतोष सुभाष बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल, नेमणूक शिरूर पोलीस स्टेशन यांनी दाखल केली असून आबा विठ्ठल शिंदे (वय ५०),लक्ष्मण सिताराम शिंदे (वय ३३),दादा रकमा कोळपे (वय ३८), सर्व रा. शिंदेवाडी, ता. शिरूर,अकबर अब्बास पटेल (वय ६४), रा. डोंगरगण, शिवाजी कृष्णा शेंडगे (वय ५०), रा. डोंगरगण, कारभारी मच्छिंद्र डांगे (वय ५४), रा. सोनेसांगवी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सदर आरोपी फॉरेस्टच्या मोकळ्या जागेत एकत्र जमून तीनपत्ती नावाचा जुगार खेळताना व पैशाची देवाणघेवाण करताना रंगेहाथ आढळून आले. या प्रकारामुळे कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बनकर हे करत आहे.
बेट भागातील पोलीस स्टेशनच्या या तत्पर कारवाईमुळे स्थानिक परिसरात पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे. बेट भागासह शिरूर तालुक्यातील अवैध जुगार व गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी शिरूर पोलीसांनी अजून ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…