शिरूर, दि. ६ (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील कामाठीपुरा परिसरात एका महिलेला घरगुती काम करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मयत महिलेचे नाव मीना चंद्रशेखर गुप्ता (वय ४०, रा. कामाठीपुरा, शिरूर) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (दि. ५) ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता, मीना गुप्ता या नेहमीप्रमाणे घरातील नळाचे पाणी भरण्यासाठी मोटार चालू करत होत्या. यावेळी त्यांना अचानक विजेचा झटका बसला आणि त्या जागेवरच कोसळल्या.
कुटुंबातील सदस्यांनी तातडीने त्यांना माणिकचंद हॉस्पिटल शिरूर येथे दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी मृत्यूची नोंद ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४५ वा. केली.या प्रकरणी मयत महिलेचा मुलगा प्रमोद चंद्रशेखर गुप्ता (वय २५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात खबर दिली असून, यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार राऊत करत आहे.या दुर्दैवी घटनेमुळे गुप्ता कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून, अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी नागरिकांनी घरगुती वीज उपकरणे हाताळताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन महावितरणचे उपकार्यकारी अभियंतापदी शरद माने यांनी केले आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…