क्राईम

शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील वाजेवाडीजवळ अपघातात चालक ठार तर…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर-चाकण रस्त्यावर वाहनांना ओहरटेक करणारी कार कंटेनर वर आदळून झालेल्या अपघातात कार चालक ठार होऊन आठ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. राहुल तेजराव हिवाळे असे चालकाचे नाव असून मयत चालकावर शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने तौकिर आलम हे शनिवारी (ता. २२) पहाटेच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील एम एच ४६ बि बी ३४३८ हा कंटेनर घेऊन चालले होते. समोरून वाहनांची रांग लागलेली असल्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला कंटेनर उभा केला. याचवेळी चाकण बाजूकडून भरधाव वेगाने एम एच ०७ क्यू ३६०० ही झायलो कार समोरील वाहनांना ओव्हरटेक करत आली. कार वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार तौकिर आलम यांच्या कंटेनर वर जोरात आदळली आणि मोठा अपघात झाला.

कार मधील चालक कार मध्येच अडकल्याची माहिती मिळतात शिक्रापूर पोलिस स्टेशनचे अपघात मदत पथकातील पोलिस नाईक राकेश मळेकर, लखन शिरसकर यांचे स्थानिक नागरिक स्वप्नील शेळके, कानिफ मांजरे, आबा मांजरे, अतुल मांजरे, उमेश वाजे, रामदास मांजरे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कार मधील जखमींना कार मधून बाहेर काढून उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान कारचालक राहुल तेजराव हिवाळे (वय ४० वर्षे रा. कोल्हापूर पोस्ट मोहोरा ता. जाफराबाद जि. जालना) त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. कार मधील आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. घडलेल्या घटनेबाबत कंटेनर चालक तौकिर परवेज आलम (वय २२ वर्षे रा. कळंबोली नवी मुंबई, मूळ रा. चंपारन रामगडवा जि. मुतियारी बिहार) याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी मयत कार चालक राहुल तेजराव हिवाळे (वय ४० वर्षे रा. कोल्हापूर पोस्ट मोहोरा ता. जाफराबाद जि. जालना) याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

15 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

15 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

15 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

17 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago