dalimb-tree
शिरूर (अरुणकुमार मोटे) : जांबुत-शरदवाडी (ता. शिरूर) परिसरात दोन शेतकर्यांनी कष्टाचे पीक फुलत असताना मध्यरात्रीच्या अंधारात घडलेल्या अमानुष प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. कोर्टात जमीन-वाटपाचा विषय प्रलंबित असतानाच सख्ख्या भावानेच दोन भावांच्या शेतातील तब्बल १३०० डाळिंब झाडे तोडून नासधूस केली आहे. संबंधित झाडे शेतकरी शहाजी निवृत्ती थोरात व दिलीप निवृत्ती थोरात या दोन भावांची असून, रात्रीच्या वेळी त्यांचा सख्खा भाऊ बाळू निवृत्ती थोरात व इतरांनी झाडे तोडल्या ची लेखी तक्रार शिरूर पोलीस स्टेशन येथे केली आहे. या घटनेने शरदवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
शहाजी व दिलीप थोरात यांनी चार वर्षांपूर्वी भगवा जातीची १३०० रोपे सुमारे तीन एकर क्षेत्रावर लावली होती. लाखो रुपयांचा खर्च करून ही झाडे त्यांनी मनापासून वाढवली. सध्या या डाळिंब पिकाला मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली होती आणि पुढील दोन महिन्यांत काढणी अपेक्षित होती. परंतु शुक्रवारी मध्यरात्री शेतात घुसून सर्व १३०० झाडे मूळासकट तोडली, अशी धक्कादायक माहिती शेतकरी थोरात यांनी दिली. या तोडफोडीमुळे गत चार वर्षांचा परिश्रम, खर्च आणि अपेक्षित उत्पन्न याचा पूर्णपणे विनाश झाला आहे. लागवड, सिंचन, खतांची गुंतवणूक, मजूर खर्च, औषध फवारणी ते निगा या सर्वांचा विचार करता शेतकऱ्यांनी आतापर्यंत मोठे भांडवल खर्च केले होते. या सर्वाची गणना करताना अंदाजे ४० ते ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी शहाजी आणि दिलीप थोरात यांनी सांगितले.
सध्या शेतमालाला योग्य भाव नाही. कांदा, भाजीपाला यांचे दर कोसळलेले. अशातच एवढे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीवर जबरदस्त परिणाम झाला आहे. सदर शेतजमिनीचा वाटपाचा विषय कोर्टात प्रलंबित आहे. न्यायालयाने अंतिम निर्णय दिलेला नसतानाही झाडे तोडून टाकणे हा न्याय व कायद्याचा अवमान ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांनी थेट आरोप केला आहे की, आमचा भाऊ “बाळू निवृत्ती थोरात व इतरांनी मध्यरात्री येऊन झाडांची निर्दयीपणे तोडफोड केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर जांबुत–शरदवाडी परिसरातील सर्व शेतकरी व नातेवाईक संतप्त झाले आहेत. त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की,दोषींवर त्वरित व कडक कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी मदत द्यावीअशा घटनांना आळा घालण्यासाठी विशेष सुरक्षा उपाय करावेत. ही घटना केवळ दोन शेतकऱ्यांचे नुकसान नाही, तर संपूर्ण शेतकरी समाजाच्या मनात भीती निर्माण करणारी आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस व महसूल विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेतकरी थोरात यांचा भावनिक उद्गार…
‘चार वर्षे आम्ही या झाडांना लेकरांसारखी वाढवले… आता फळधारणा झाली होती. तीन महिन्यात पीक हातात येणार होते. पण रात्रीच्यावेळी येऊन भावानेच निर्दयीपणे १३०० झाडे तोडली. आमचे चार वर्षांचे स्वप्न एका क्षणात संपले.”
– शहाजी व दिलीप थोरात
शिरूर तालुक्यात समाजकंटकाने शेतकऱ्यांची डाळिंबाची तब्बल १३०० झाडे तोडली…
शिरूर तालुक्यातील वृद्ध महिलेची जमिन लुटण्यात भूमि अभिलेख विभागसुद्धा सामिल!
शिरूर तालुक्यात तब्बल ४० किलो वजनाचा व १५-२० फुटांचा अजगर; शेळी गिळली…
MIDC परिसरातील तांब्याच्या तारा चोरी प्रकरणी शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई…
शिरूर शहरात स्टीमरूम कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची अश्लील चाळे; कारवाईची मागणी…
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…