क्राईम

शिरुर ; काम चालू ठेवायचे असेल तर दरमहा लाख रुपये द्यावे लागतील…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे केटरींग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचे (वय ३९) अपहरण करून त्याच्याकडून महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. खंडणी न दिल्यामुळे आरोपींनी व्यावसायिकाला मारहाण करत सोन्याचे दागिने व रोकड जबरीने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे.

फिर्यादी रोहन प्रकाश शिंदे (रा. वाघोली) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते किआँन इंडिया प्रा.लि. कंपनी (कोरेगाव भीमा) येथे १ सप्टेंबरपासून केटरींगचे काम पाहत आहेत. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजता कंपनीच्या गेटवर गणेश फडतरे, विशाल शिवले व एक अनोळखी व्यक्ती यांनी त्यांना बोलावून जबरदस्ती इनोव्हा गाडीत बसवून त्यांच्या ऑफिसमध्ये नेले. तिथे “काम चालू ठेवायचे असेल तर दरमहा एक लाख रुपये द्यावे लागतील” अशी धमकी दिली.

फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठीमागून पाठलाग करून गाडीने धडक दिली. खाली पडल्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करून उजव्या पायाला, पाठीस तसेच कानावर मार लागून दुखापत झाली. यावेळी गळ्यातील सुमारे पाच तोळे सोन्याची चैन (अंदाजे तीन लाख रुपये किंमत) व पँटच्या खिशातील दहा हजार रुपयांचे पाकीट हिसकावून नेण्यात आले. या घटनेनंतर शिंदे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. शिक्रापूर पोलिसांनी गणेश फडतरे, विशाल शिवले व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक डोंगरे हे करत आहेत.

शिरूर तालुक्यात गुटखा माफियांना अभय, पोलिसांच्या निष्क्रीयतेविरोधात संतापाची लाट

शिरूर शहरात अमोल ज्वेलर्सवर धाडसी दरोडा; मालकाने गॅलरीतून पाहिले अन्…

शिरूर पोलिसांत माजी आमदारासह अकरा जणांवर गुन्हा

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अंमली पदार्थ विक्रीत युवक जेरबंद…

शिरूर! मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या नावाचा वापर करुन ‘स्वयंघोषित नेते’ धरतात अधिकाऱ्यांना वेठीस…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…

38 मिनिटे ago

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…

41 मिनिटे ago

विद्याधाम विद्यालयात प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण जल्लोष

शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई…

1 तास ago

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

11 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

12 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

13 तास ago