क्राईम

शिरुर ; काम चालू ठेवायचे असेल तर दरमहा लाख रुपये द्यावे लागतील…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे केटरींग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचे (वय ३९) अपहरण करून त्याच्याकडून महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. खंडणी न दिल्यामुळे आरोपींनी व्यावसायिकाला मारहाण करत सोन्याचे दागिने व रोकड जबरीने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे.

फिर्यादी रोहन प्रकाश शिंदे (रा. वाघोली) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते किआँन इंडिया प्रा.लि. कंपनी (कोरेगाव भीमा) येथे १ सप्टेंबरपासून केटरींगचे काम पाहत आहेत. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजता कंपनीच्या गेटवर गणेश फडतरे, विशाल शिवले व एक अनोळखी व्यक्ती यांनी त्यांना बोलावून जबरदस्ती इनोव्हा गाडीत बसवून त्यांच्या ऑफिसमध्ये नेले. तिथे “काम चालू ठेवायचे असेल तर दरमहा एक लाख रुपये द्यावे लागतील” अशी धमकी दिली.

फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठीमागून पाठलाग करून गाडीने धडक दिली. खाली पडल्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करून उजव्या पायाला, पाठीस तसेच कानावर मार लागून दुखापत झाली. यावेळी गळ्यातील सुमारे पाच तोळे सोन्याची चैन (अंदाजे तीन लाख रुपये किंमत) व पँटच्या खिशातील दहा हजार रुपयांचे पाकीट हिसकावून नेण्यात आले. या घटनेनंतर शिंदे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. शिक्रापूर पोलिसांनी गणेश फडतरे, विशाल शिवले व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक डोंगरे हे करत आहेत.

शिरूर तालुक्यात गुटखा माफियांना अभय, पोलिसांच्या निष्क्रीयतेविरोधात संतापाची लाट

शिरूर शहरात अमोल ज्वेलर्सवर धाडसी दरोडा; मालकाने गॅलरीतून पाहिले अन्…

शिरूर पोलिसांत माजी आमदारासह अकरा जणांवर गुन्हा

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अंमली पदार्थ विक्रीत युवक जेरबंद…

शिरूर! मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या नावाचा वापर करुन ‘स्वयंघोषित नेते’ धरतात अधिकाऱ्यांना वेठीस…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

2 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

2 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

2 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

2 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

7 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

7 तास ago