shirur-accident
शिरूर (नितीन थोरात) : शिरूर-राजगुरुनगर मार्गावर आज (सोमवार) दुपारी सुमारे चारच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात आमदाबाद हद्दीतील माशेरे मळ्याजवळ घडला असून, या दुर्घटनेत दुचाकीवरील पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवर (MH14 EZ1239) एक पुरुष, दोन महिला आणि दोन लहान मुले असा पाच जणांचा प्रवास सुरू होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनासोबत (MH12 XX2486) त्यांची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून सर्व प्रवासी गंभीर अवस्थेत आढळून आले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्याचमुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शिरूर-राजगुरुनगर मार्गावरील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…
शिरूरमध्ये अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक बसविण्याची नागरीकांची मागणी
Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात आईचा जागीच मृत्यू, दोन चिमुकले जखमी…
शिरूर येथे भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार तर एक जखमी…
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…