Shirur Robbery
शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे पाठोपाठ न्हावरा येथे एका दाम्पत्याला तीन अनोळखी चोरट्यांनी गंभीर मारहाण करत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसुत्र व रोख रक्कम असा एकुण १ लाख ६५ रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
लिलाबाई परशुराम नागवडे (वय 50, रा नागवडे वस्ती, न्हावरे, ता शिरूर) यांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, सोमवारी (ता. १२) पहाटे 02.30 वा सुमारास मौजे न्हावरा गावचे हद्दीत नागवडे वस्ती (न्हावरे, ता. शिरूर) येथे घरी झोपले असताना फिर्यादी यांची नंनद भामाबाई हि लघुशंकेसाठी घराबाहेर जावून परत आत येत असताना तिच्या मागे तिन अनोळखी चोर हे रात्रीच्या वेळी घरफोडी करण्याचे उददेशाने घरात घुसले. त्यापैकी एकाने त्याचे हातातील कुऱ्हाडीचे उलट्या बाजुने परशुराम नागवडे यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.
फिर्यादी लिलाबाई परशुराम नागवडे यांनी कुऱ्हाड हिसकावल्यावर चोरट्याने जवळ पडलेल्या लोखंडी गजाने फिर्यादी यांच्या डाव्या हातावर पाठीवर मारहाण करून त्यांना कानातील फुले व गळ्यातील मणीमंगळसुत्र ओढुन कानाला दुखापत केली. शिवाय, त्यांची ननंद भामाबाई हिचे गळ्यातील पोत ओढून गंभीर दुखापत करून पळून गेले. याबाबत गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ऊपनिरीक्षक एकनाथ पाटील हे पाटील हे करत आहेत.
पुणे-नगर महामार्गावर शिरुर मध्ये एसटीच्या मालट्रकला आग अन्…
शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात चुलती व पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ
शिरुर तालुक्यात हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी करत वृद्ध दाम्पत्याला गंभीर मारहाण
शिरुर; घोडनदीत रस्सीने बांधून टाकलेला अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलले…
शिरुरच्या सराफावर बंदुकीने हल्ला करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…
मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…
मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…
बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…